कणकवली संपूर्ण माहिती मराठी : kankavali Information In Marathi

कणकवली संपूर्ण माहिती मराठी : kankavali Information In Marathi – येवा कोकण आपलोच असा’ असे म्हणणारे कोकणकर आणि आपले हे कोकण म्हणजे स्वर्गसुख. कोकण हा खरंतर महाराष्ट्रातील कॅलिफोर्निया असे नेहमीच म्हटले गेले आहे. इथले समुद्रकिनारे, शुद्ध हवा, परिसर या सगळ्यांनी मन अगदी प्रसन्न होऊन जाते. इतकेच नाही तर, तब्येतही चांगली राहते. येथील हवाच निराळी आहे. त्यामुळे रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून सुटका हवी असेल तर कोकण सहल ही वर्षातून किमान एकदा तरी करायलाच हवी.

या कोकणातील, सिंधुदुर्ग जिल्हा हा कोकण म्हणून ओळखला जाणाऱ्या मोठ्या भूभागाचा दक्षिणेकडील भाग आहे, जो ऐतिहासिक दृष्ट्या लांब किनारपट्टी आणि सुरक्षित बंदरासाठी प्रसिद्ध आहे. अशा या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. म्हणजेच भटकंती करणार आहोत. चला तर मग, वेळ न घालवता आपण जाणून घेऊयात कणकवली तालुक्याची भटकंती.

Table of Contents

कणकवली संपूर्ण माहिती मराठी | kankavali Information In Marathi

कणकवली हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुण्यापासून ३३८ किमी अंतरावर वसलेले एक छोटेसे शहर आहे. हे गड नदी आणि जानवली नदी या दोन नद्यांच्या मध्ये आहे. भालचंद्र महाराज मंदिर आणि सावडाव धबधबा ही शहरातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत.

कणकवलीचा इतिहास (History Of Kankavali)

या शहराने इतिहासातील प्रमुख राजघराण्यांची राजवट पाहिली. या शहरावर चालुक्य राजवंश, मौर्य साम्राज्य, नाला राजवंश, मराठा साम्राज्य, पोर्तुगीज सत्ता आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य होते.

कणकवली हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गाव व तालुक्याचे मुख्यालय आणि भालचंद्र महाराजंचे समाधिस्थळ म्हणून ओळखले जाते. कोकणच्या तळ कोकण भागात मालवणच्या ५० किमी ईशान्येस व सावंतवाडीच्या ६३ किमी उत्तरेस राष्ट्रीय महामार्ग १७ वर वसलेल्या या शहराची लोकसंख्या २०११ साली सुमारे १६ हजार होती.

कणकवलीची प्रारंभीक माहिती

खाण्यासाठी शौकीन असलेल्या या शहरातील अरोमाज कॅफे, मल्टीक्युझिन रेस्टॉरंट आणि तिरफळ कोस्टल क्युझिन रेस्टॉरंट सारख्या काही उच्च दर्जाच्या रेस्टॉरंटमधून सीफूड अत्यंत चविष्ट प्रकारचे मिळते. या ठिकाणी जाण्यासाठी हिवाळा हा उत्तम ऋतू मानला जातो. सर्वात जवळचे कोल्हापूर विमानतळ ८० किमी अंतरावर आहे आणि गोव्याचे दाबोलीम विमानतळ शहरापासून १०० किमी अंतरावर आहे.

कोकण रेल्वेमार्गावर स्थित असलेल्या या रेल्वे स्थानकावर मांडवी एक्सप्रेस, कोकण कन्या एक्सप्रेस, जन शताब्दी एक्सप्रेस, मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस इत्यादी अनेक रोज धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचा थांबा आहे. या रेल्वे स्थानकावरून नियमित गाड्या चालतात. कोल्हापूर आणि पणजी सारख्या जवळच्या शहरांमधून बसेस उपलब्ध आहेत.

kankavali Information In Marathi

कणकवलीची भौगोलिक माहिती

कणकवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४२ मीटर उंचीवर असलेले शहर आहे. हे जिल्हा मुख्य शहर सिंधुदुर्गपासून १५ किमी अंतरावर आणि राज्याची राजधानी मुंबईपासून सुमारे ४९१ किमी अंतरावर आहे. भालचंद्र महाराज मंदिर हे एक प्रमुख उपासना स्थळ आणि शहरातील प्रमुख खूण आहे.

या शहराचे क्षेत्रफळ ८.४६ चौ.कि.मी. आणि उत्तरेला अक्षांश १६.२८५५१° आणि पूर्वेला ७३.६८४४६° रेखांश दरम्यान स्थित आहे. या शहराचा पोस्टल कोड ४१६६०२ आहे. कणकवली हे सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय आणि एस.एम. यासारख्या शैक्षणिक संस्थांसाठी प्रसिद्ध आहे. हायस्कूल, भालचंद्र महाराज आणि सावडाव धबधबा ही प्रमुख पर्यटन स्थळे आहेत.

ठिकाण कणकवली
राज्यमहाराष्ट्र
जिल्हासिंधुदुर्ग
क्षेत्रफळ८.४६ चौ. किमी (३.२७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची१३८ फूट (४२ मी)
लोकसंख्या(२०११) शहर-१६,३९८
प्रमाणवेळभारतीय प्रमाणवेळ

देवगड संपूर्ण माहिती मराठी 

कणकवली चा नकाशा आणि स्थान

कणकवली नावाचा अर्थ (Meaning Of Kankavali)

कंकवली नाम संस्कृत नावाच्या ‘कनकवल्ली’ (देवनागरी: कनकवल्ली) पासून तयार आहे ज्याचा अर्थ सुवर्ण भूमी आहे. (कानका: गोल्ड; वल्ली: जमीन)

कणकवली तालुक्यातील प्रमुख गावे

या तालुक्यात एकूण १०५ गावे आहेत. त्यातील काही प्रसिद्ध गावे खालील प्रमाणे –

  • शिरवली
  • सावडव
  • करंजे
  • नागवे
  • वरवडे
  • बिडवाडी

सावंतवाडी पर्यटन संपूर्ण माहिती

कणकवली तालुक्याची लोकसंख्या

  • कणकवली तालुका – सिंधुदुर्ग
  • कणकवली नगर पंचायत महाराष्ट्र १६,३९८

कणकवली शहराचा संपर्क

राष्ट्रीय महामार्ग १७ आणि राष्ट्रीय महामार्ग ६६ हे प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहेत, जे या शहरातून जातात. ते राज्य आणि देशातील प्रमुख शहरांशी जोडतात. हे शहर आणि जवळच्या शहरांमध्ये नियमित MSRTC आणि खाजगी लक्झरी बसेस आहेत ज्यात कोल्हापूर, बेळगाव, पणजी आणि कर्नाटक राज्यातील शहरांचा समावेश आहे. हे शहर आणि इतर स्थानिक बस टर्मिनल्सवरून बसेस सहज उपलब्ध आहेत.

कणकवली रेल्वे स्टेशन शहराच्या मध्यभागी फक्त २ किमी अंतरावर आहे आणि दाबोलीम विमानतळ गोवा हे कणकवलीपासून १३३ किमी अंतरावर सर्वात जवळचे विमानतळ आहे.

कणकवलीला कसे जायचे?

कणकवलीला विमानाने कसे जायचे?

कोल्हापूर विमानतळ हे कणकवलीसाठी सर्वात जवळचे विमानतळ आहे, जे शहरापासून ८० किमी अंतरावर आहे.

गोव्याचे दाबोलीम- विमानतळ देखील शहरापासून फक्त १०० किमी अंतरावर आहे.

कणकवलीला रेल्वेने कसे जायचे?

कणकवली हे कोकण रेल्वे क्षेत्रातील एक महत्त्वाचे रेल्वेस्थानक आहे. अनेक सुपर फास्ट गाड्या येथे थांबतात. या सुंदर शहरापासून मुंबई फक्त ४६० किलोमीटर अंतरावर आहे, त्यामुळे या ठिकाणी येण्यास कोणतीही अडचण येत नाही. मुंबईवरून कणकवलीला कसे पोहोचायचे ते सहज कळेल.

रस्त्याने कणकवलीला कसे जायचे?

येथे बसेस सहज उपलब्ध आहेत. पर्यटकांना मदत करण्यासाठी येथे राज्य परिवहन बस स्थानक आहे. कणकवलीजवळील प्रमुख शहरांमध्ये कोल्हापूर हे ११० किमी आणि पणजी ११५ किमी यांचा समावेश होतो. याशिवाय राज्याची राजधानी मुंबई कणकवलीपासून ४९० किमी दूर आहे तर पुणे ३४० किमी अंतरावर आहे.

कणकवली पर्यटन स्थळे (Kankavali Tourism)

सावडाव धबधबा (Savdav Waterfall)

या शहर केंद्रापासून १० किमी अंतरावर असलेला सावडाव धबधबा त्याच्या निसर्गसौंदर्यासाठी जिल्हाभरातील, त्याचप्रमाणे मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरातील पर्यटकांना आकर्षित करतो. अजस्र खडकावरून खाली कोसळणारा, ६० ते ७० फूट उंचीवरून कोसळणाऱ्या शुभ्र धारा डोळय़ांचे पारणे फेडतात. आणि फेसाळणारा सावडाव धबधबा मनाच्या कोपऱ्यात कायमचे स्थान मिळवून जातो. सुंदर, नयनरम्य असलेल्या या धबधब्याचा प्रवास गर्द वनराईतून सुरू होतो.

तारकर्ली – देवबाग संपूर्ण माहिती

तळकोकणातील सौंदर्याचे एकत्रित चित्र साकारावे तसा हा धबधबा आहे.मुंबई-गोवा महामार्गावर शहरापासून मुंबईच्या दिशेने पाच किलोमीटर, तर नांदगाव तिठ्यावरून सहा किमी. अंतर पार केले की, सावडाव फाटा अर्थातच सावडाव धबधब्याकडे जाणारा मार्ग सुरू होतो. जून ते ऑक्‍टोबर या दरम्यान धबधब्यापर्यंत असलेला हा परिसर येणार प्रत्येक पर्यटक आपल्या कॅमेऱ्यात साठवून ठेवत असतो.

कधी रस्त्यालगत वसलेल्या वाड्या, मध्येच उंच डोंगरावर वसलेले कौलारू घर,कधी घनदाट जंगल, तर वळणावळणाचा नागमोडी रस्ता, प्राथमिक शाळा,दोन्ही बाजूला असणारी भातशेती, पर्यटकांचे स्वागत करणारी भव्य कमान आणि त्यानंतर धबधब्याच्या प्रवेशद्वारावर पर्यटन कर भरल्यानंतर वाहनचालकांना धडकी भरवणारा धबधब्याचा चढाव चढावा लागतो. हा चढाव पार केल्यानंतर थेट सावडाव धबधब्याच्या शिखरापर्यन्त पोचता येते. उंच डोंगरावरून कोसळणाऱ्या या जलधारा अंगावर झेलण्याची मजा काही औरच असते.

भालचंद्र महाराज आश्रम

भालचंद्र महाराज आश्रम हे भालचंद्र बाबांचे तपश्चर्येचे ठिकाण आहे. हे पवित्र स्थान राज्यात सर्वत्र लोकप्रिय आहे आणि श्री देव काशीविश्वेश्वर आणि श्री देव दत्त मंदिर भालचंद्र महाराज आश्रमाजवळ आहे.

भालचंद्र महाराज आश्रम

सत्पुरूषांच्या या पुण्य कोकण भूमित सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे सन – १९२९ साली परमहंस भालचंद्र महाराज प्रकट झाले. आणि या ठिकाणाला त्यांनी आपली तपोभुमी बनविली. परमहंस बाबांच्या तपसाधनेने, वास्तव्याने व कृपाछञाने पविञ बनलेल्या व पावन झालेल्या या नगरीचे आजचे जे विकसित उत्क्रांती होत गेलेले स्वरुप आहे ते केवळ परमहंस भालचंद्र महाराजांच्या कृपाछञाने निर्माण झालेले आहे. अशीयेथील लोकांची तसेच त्यांच्या असंख्य भाविकाची श्रध्दा आहे. परमहंस भालचंद्र महाराजांचे अगणित भक्तगण महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर संपुर्ण भारत देशाच्या कानाकोप-यात ठिकठिकाणी विखुरले गेले आहेत.

परमहंस भालचंद्र बाबांची कृपेची छाया विविध प्रकारे अनुभवत आहेत. त्यांचा कृपाप्रसाद मिळाल्याणे भक्तगण कृतार्थ होत आहेत. कणकवली शहरात त्यांची समाधी आहे. त्या समाधी स्थळावर सुंदर मठाची स्थापना करण्यात आली आहे. भालचंद्र महाराजांचे सर्व भक्तगण दरवर्षी महाराजांच्या जन्मादिवशी महाराजांच्या मठात येतात.

अतिशय धीर गंभीर आणि प्रसन्नतेने भालचंद्र महाराजांचे मठ भरुन राहिल्याने येथे येणारा भक्तगण आनंदीमनाने तृप्त होतो. मठामधे भालचंद्र महारांजानी जेथे समाधी घेतली ते स्थान अतिशय पवित्र आहे. इथे आल्यावर मन:शांती लाभते.

नापणे धबधबा

४० फूट उंचीचा डोह, पक्ष्यांचा किलबिलाट, शंभर फुटांवरून कोसळणारे पाणी, त्यातून निघणारे दवबिंदू आणि धबधब्याच्या दोन्ही बाजूंनी वेढलेली वृक्षवल्ली असे अद्‌भुत आणि निसर्गाने भरभरून दिलेले ठिकाण म्हणजे नापणे धबधबा. राज्यासह परराज्यांतील हजारो पर्यटक या धबधब्यावर येतात. आणि पर्यटनाचा आस्वाद लुटतात. उंच डोंगरावरून कोसळणाऱ्या या जलधारा अंगावर झेलण्याची मजा काही औरच असते.धबधब्याच्या वरच्या बाजूस नाधवडे याठिकाणी महादेवाचं मंदिर आहे. त्या नजीक दगड कपारीतून पाण्याचा प्रवाह वर येतो. तीच ही नदी पुढे नापणे धबधब्यापर्यंत जाते.

बारमाही वाहणारा जिल्हा परिसरातील हा एकमेव धबधबा आहे. त्यामुळे इतर धबधब्यांचे पाणी आटल्यानंतर पर्यटकांचा ओढा या धबधब्याकडे वाढतो. धबधब्याचे पाणी ज्या कड्यावरून कोसळते, त्या पाण्यावरून व्हॅली क्रॉसिंगचा अनुभव घेता येतो. दोरीवरून लटकत जाणाऱ्या व्यक्तीला धबधब्याचे कोसळणारे पाणी, डोह अगदी जवळून पाहता येते. हे साहसी पर्यटन असले, तरी यामध्ये कोणताही धोका नाही. डोळय़ांचे पारणे फेडणारा आणि फेसाळणारा धबधबा म्हणून नापणे धबधबा हे अप्रतिम पर्यटनस्थळ आहे.

रामगड किल्ला

रामगड या ठिकाणाहून १२ किमीवर,मालवणहून २९ किमी वर आहे.गडनदी मार्गे होणार्‍या व्यापारावर, जलवहातूकीवर लक्ष ठेवण्यासाठी ‘रामगड’ किल्ला बांधण्यात आला. या रामगड किल्ल्याची उभारणी शिवाजी महाराजांनी केली. या गडाचे प्रवेशद्वार ८ फुट उंच आहे. तसेच प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला १८ फूट उंच बुरुज आहेत. या किल्ल्यावर ७ तोफा रांगेत उलट्या पुरुन ठेवलेल्या दिसतात. त्यातील सर्वात मोठी तोफ ७ फूट लांबीची आहे. या किल्ल्यावर किल्लेदाराच्या वाड्याचा चौथरा आहे, पण पाण्याची विहीर अथवा तलाव आढळत नाही.

कणकवलीच्या आसपासची इतर पर्यटन स्थळे

विजयदुर्ग बंदर

विजयदुर्ग बंदरामध्ये समुद्रकिनाऱ्यापासून चार मीटरची खोली आहे. तर दीड किलोमीटर परिघात आणि १८ मीटरची खोली आहे. पूर्वी हे एक मोठे व्यापारी बंदर म्हणून ओळखले जात असायचे. वाघोडून खाडीतून खारेपाटण पर्यंत होणारी मालवाहतूक तसेच कोल्हापूर फोंडा या भागात माळ हा या ठिकाणाहून जात होता. पश्चिम महाराष्ट्राला अतिशय जवळ असणारे असे हे बंदर त्याकाळी व्यापार उद्योगामुळे भरभराटीला आले होते.

प्रवासी बोटिंगमुळे तसेच व्यापारी उलाढाल आणि आंब्याच्या हंगामामध्ये बोटीतून मुंबईला पार्सल पाठवण्यासाठी असणारी व्यापाऱ्यांची गर्दी यामुळे हे बंदर कायम गजबजलेले असायचे. परंतु या ठिकाणची जलवाहतूक ही आता बंद झालेली आहे.

आंबोली हिल स्टेशन सावंतवाडी

आंबोली घाट म्हटलं की समोर येतं ते दाट धुकं, उंचच उंच कड्यावरून कोसळणारे धबधबे आणि धो धो कोसळणारा पाऊस. या तिन्हीचं मिलन बघायचं असेल, तर या सारखं ठिकाण नाही. आंबोलीला प्रतीचेरापुंजी म्हणूनही ओळखलं जातं. बघा चेरापुंजीला वर्षाकाठी पाचशे इंच पाऊस पडतो तर इथे केवळ चार महिन्यात ४०० इंच पाऊस कोसळतो.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेला इथला पाऊस ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत पडत असतो, आणि त्यामुळेच बाराही महिने, इथला निसर्ग हिरवा शालू नेसलेला असतो. इकडचे धबधबे, हिरण्यकेशी नदी व त्या नदीच्या बाजूला असणारे हिरण्यकेशी मातीचे मंदिर, नांगरतास धबधबा, महादेव गड, मनोहर गड इत्यादी गोष्टी पाहण्यासारख्या आहेत.

जलक्रीडा तारकर्ली आणि जलक्रीडा मालवण

मालवण आणि तारकर्ली या ठिकाणी होणाऱ्या वॉटर स्पोर्ट्स मध्ये फ्लाय बोर्डिंग, बनाना राईड,स्पीड बोटिंग, बंपर राईड, जेट्स की कयाकिंग राईड, वॉटर फिशिंग यासारखे प्रकार करावयास मिळतात.

तारकर्ली वॉटर स्पोर्ट्स

चिपी विमानतळ

मुंबई – गोवा महामार्गापासून जवळपास २८ किलोमीटरच्या अंतरावर आणि मालवण पासून १२ किलोमीटरच्या अंतरावर असणारे हे चीपी परुळे विमानतळ आहे. २०१८ च्या उत्तरार्धात या विमानतळाचे बांधकाम पूर्ण झाले. आणि २०१९ ला या विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच २०२१ ला या ठिकाणची उड्डाणे सुरू झाली.

कुणकेश्वर मंदिर

कुणकेश्वर मंदिर हे देवगड शहरापासून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या कुणकेश्वर गावात वसलेले प्राचीन शिवमंदिर आहे. समुद्रकिनारा आणि पांढर्‍या वाळूने लांब पसरलेल्या प्राचीन समुद्रकिनाऱ्याने वेढलेले आहे, जे त्याच्या सौंदर्यात भर घालत आहे.

या मंदिरात दक्षिण भारतीय शैलीतील मंदिर स्थापत्य शैलीची आठवण करून देणारी आकर्षक वास्तुशिल्प आहे, जे यादव राजांनी ११०० मध्ये बांधले होते. हे दक्षिण कोकणची काशी म्हणूनही ओळखले जाते. आणि महाशिवरात्री उत्सवादरम्यान भक्तांद्वारे शोधले जाते. येथील जागृत शिव देवता आपल्या चरणी शरण आलेल्या प्रत्येकाला आशीर्वाद देते.

लक्ष्मीनारायण मंदिर

शहरापासुन १५ किमी अंतरावर असलेलं श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे हेमाडपंथी वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे. गर्द वनराईने नटलेलं वालावल गाव आणि मंदिरालगतचा सुंदर व शांत तलाव मंदिराच्या सौंदर्यात अधिकच भर घालतो. हे मंदिर सुमारे आठशे वर्षापूर्वेचे असल्याचे जाणकार सांगतात. या मंदिराचं बांधकाम चौदाव्या शतकात सूर्यभान आणि चंद्रभान प्रभुदेसाई या महापराक्रमी बंधूंनी केले. त्यांची स्मारके श्री लक्ष्मीनारायण मंदिरासमोरील दीपमाळांजवळ कल्याण पुरूष म्हणुन उभी आहेत.

मांगेली धबधबा

कर्नाटक सिंधुदुर्गच्या सीमेवर असलेला मांगेलीचा धबधबा तसा दुर्लक्षितच राहील आहे. मात्र कर्नाटक, गोवा सीमेजवळील तसेच सिंधुदुर्गवासी पर्यटक इथे आवर्जून भेट देतात. याठिकाणचे निसर्ग सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करून टाकते. गर्द वनराईतील हा धबधबा दोडामार्गाहून ३० कि. मी. अंतरावर आहे. मुंबई-गोवा महामार्गाजवळील बांदा या ठिकाणाहून दोडामार्गला ४० कि.मी. अंतर कापून जावे लागते. मांगेली या गावापर्यंत एस.टी.बस जाते. परंतु गावातून धबधब्यावर चालत जावे लागते. हा धबधबा चालत जाऊन पाहण्यातच खरी मजा आहे.

श्री देव रामेश्वर मंदिर

हुमरमळा हे छोटेसे, परंतु निसर्गसंपन्नतेने परिपूर्ण बहरलेले गाव. श्री देव रामेश्वराच्या छत्रछायेखाली या गावाची विकासाकडे घोडदौड चालूच आहे. गावाला धार्मिक संस्कृतीही लाभलेली आहे. येथील श्री देव रामेश्वर मंदिरातील रथ अत्यंत प्रसिद्ध आहे. शिवरात्रीला या ठिकाणी शिवरथोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. या वेळी मुंबई, गोवा आणि सिंधुदुर्गातील भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित राहतात. गावाला लागूनच असलेला कुपीचा डोंगर पर्यटन स्थळ आहे. येथे पर्यटकांची ये-जा असते.

सावंतवाडी पॅलेस

सावंतवाडी राजवाडा – सावंतवाडीचा रॉयल पॅलेस- सिंधुदुर्गातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. या राजवाड्याची बांधणी ही खेम सावंत भोसले यांच्या कारकिर्दीत १७७५ ते १८०३ मध्ये झाली. हा जुना राजवाडा आता हस्तकलेच्या वस्तू, छायाचित्रे आणि जुन्या पुरातन वस्तूंच्या प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे.

एन्ट्री गेट (लेस्टर गेट) हा १८९५ मध्ये बांधण्यात आले होते. राजवाड्याच्या काटेकोरपणे तपकिरी भिंतींना अगदी वांशिक स्पर्श आहे. अद्भुतपणे कोरलेल्या खोल्या, युद्धाची शस्त्रे आणि कुजबुजणारे वातावरण आपल्याला पुन्हा एकदा आपल्या इतिहासातील पुस्तकांमध्ये डोकावण्यासाठी प्रेरित करते. राजवाड्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे विकसित केलेल्या आश्चर्यकारक कला आणि हस्तकला.

कुडाळ

महाराष्ट्रातील कोकण या प्रांतात असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात, कुडाळ हे मध्यवर्ती ठिकाण आहे तसेच कुडाळ शहर हे कुडाळ तालुक्याचे मुख्यालय असून हा तालुका लोकसंख्येच्या बाबतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे शहर कोकणाच्या तळकोकण भागात मालवणच्या सुमारे ३० किलोमीटर पूर्वेस वेंगुर्ल्याच्या सुमारे ३० किलोमीटर उत्तरेस व मुंबईच्या ४७५ किलोमीटर दक्षिणेस वसलेले आहे.

संत राऊळ महाराज मठ, पिंगुळी, कुडाळ

येथील भक्त वत्सल प.पू. राऊळ महाराज यांचे देखणे स्मारक त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचे शिष्य विनायक अण्णा राऊळ महाराज आणि भक्तजनांनी त्यांचे भव्य मंदिर उभारले आहे. गाभार्यामध्ये प.पू. राऊळ महाराजांची मूर्ती असून मंदिर परिसर अतिशय सुंदर आहे.

कणकवलीतील संस्कृती, खाद्यपदार्थ आणि खरेदी

या शहरातील बहुसंख्य लोक मराठी, हिंदी आणि इंग्रजीसह, मालवणी भाषा बोलतात. तांदूळ, नारळ, कोकम, आंबा, काजू ही प्रमुख पिके कणकवलीतील शेतकरी वापरतात आणि निर्यात करतात. कणकवलीच्या स्थानिक पाककृतीला सामान्यतः मालवणी पाककृती म्हणतात.

मूळ रहिवासी आपले अन्न शिजवण्यासाठी नारळ, तांदूळ, भाज्या आणि डाळ वापरतात. कोंबडी वडे आणि उकड्या तांदुळाची पेज हे कणकवलीतील लोकप्रिय खाद्यपदार्थ आहेत. हे शहर किरकोळ दुकाने, शॉपिंग मॉल्स, कापडाची दुकाने आणि सिंगल स्क्रीन थिएटर्सनी भरलेले आहे. अलिकडच्या वर्षांत, अनेक आंतरराष्ट्रीय किरकोळ दुकाने शहराभोवती त्यांचे कार्य सुरू करतात.

कणकवली मध्ये राहण्याचे पर्याय

काकीनाडा येथील हॉटेल्समध्ये २४ तास वीज आणि इंटरनेट, लॉन्ड्री, गार्डन एरिया, कॉन्फरन्स हॉल, फिटनेस सेंटर, हॉट वॉटर बाथ, एअर तिकीट बुकिंग, विमानतळावर पिकअप आणि ड्रॉप, टेनिस कोर्ट आणि पार्किंग एरिया या सुविधा उपलब्ध आहेत. पर्यटक वेगवेगळ्या श्रेणीतील हॉटेल्स निवडू शकतात ज्यात बजेट, मध्यम श्रेणी आणि लक्झरी यांचा समावेश आहे. कणकवलीतील विविध सुविधांसह सर्वोत्तम हॉटेल्स पुढीलप्रमाणे आहेत.

  • वॉटरफॉल जंगल रिसॉर्ट
  • मालवण किनारा
  • अभिरुची रिसॉर्ट्स
  • नीलम कंट्री साइड
  • Tian बीच रिसॉर्ट
  • हॉटेल चिवला बीच
  • नीलम्स कंट्री साइड
  • RSN कार्यकारी Inn
  • पितृछाया होमस्टे
  • निवती बीच रिसॉर्ट
  • राज रेसिडेन्सी क्लब आणि रिसॉर्ट
  • श्रीयोग पर्यटन होमस्टे
  • श्री साई पॅलेस
  • लिशान रिसॉर्ट
  • हिल ट्रीट हॉटेल आणि रिसॉर्ट

FAQ

कणकवली शहर कोठे आहे?

कणकवली हे शहर महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे.

कणकवली कशासाठी प्रसिद्ध आहे?

कणकवली भालचंद्र महाराज मंदिर आणि सावडाव धबधबा त्याचप्रमाणे तेथील मांसाहारी पदार्थ यासाठी प्रसिद्ध आहे.

कणकवलीला जवळचे विमानतळ कोणते आहे?

कणकवलीला जवळचे विमानतळ कोल्हापूर विमानतळ ८० किमी,चिपी, परुळे, सिंधुदुर्ग विमानतळ ६० किमी आणि गोव्याचे दाबोलीम- विमानतळ देखील शहरापासून फक्त १०० किमी अंतरावर आहे.

कणकवली तालुक्यातील प्रमुख गावे किती आहेत?

कणकवली तालुक्यातील प्रमुख गावे एकूण १०५ आहेत.

निष्कर्ष

आमच्या मराठी झटका डॉट कॉम या साईट मधील कणकवली नावाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? तो तुम्ही वाचून आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन विषयांना घेऊन तोपर्यंत नमस्कार.

Leave a comment