लाला लजपत राय माहिती मराठी Lala Lajpat Rai Information In Marathi

लाला लजपत राय माहिती मराठी Lala Lajpat Rai Information In Marathi – भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक प्रसिद्ध नायक, लाल-बाल-पाल या त्रिकुटांचे एकमेव नेते, लाला लजपत राय यांचे संपूर्ण जीवन आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणाचे स्त्रोत आहे. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये नेतृत्व तर केलेच पण, आदर्श राजकारणामध्ये कल्पिलेला आदर्श त्यांच्या जीवनातील, उदाहरणांद्वारे प्रस्थापित करण्यास ते यशस्वी झाले.

भारत हा नेहमी वीरांची जननी म्हणून संबोधला जातो. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामामध्ये अनेक वीर होऊन गेले. ज्यांनी देशाला स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी, स्वतःच्या जीवाचे बलिदान दिले. शेर-ए-पंजाब लाला लजपत राय आहे. हे एक शूर पुरुष होते.

राय यांनी त्यांचे आजीवन स्वातंत्र्यासाठी समर्पित केले. स्वातंत्र्य लढ्यातील एक महान सेनानी म्हणून लाला लजपतरा यांच्याकडून पाहिले जाते. ज्यांनी संपूर्ण जीवन देश सेवेसाठी वाहून, प्राणाची आहुती दिली.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास या मातृभूमीच्या वीर पुत्रा बद्दल, माहिती दिलेली आहे. ही माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख तुम्ही शेवटपर्यंत सविस्तर वाचा.

Table of Contents

लाला लजपत राय माहिती मराठी Lala Lajpat Rai Information In Marathi

पूर्ण नाव लाला लजपत राय
जन्म तारीख दि. २८ जानेवारी १८६५
जन्म स्थळ धुडीके, लुधियाना, पंजाब
वडिलांचे नाव मुन्शी राधाकृष्ण अग्रवाल
आईचे नाव गुलाबदेवी अग्रवाल 
ओळख पंजाब केसरी
प्रसिद्धब्रिटीश सायमन कमिशनचा निषेध
राष्ट्रीयत्वभारतीय
पार्टीभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
व्यवसाय लेखक, स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी
संघटनाहिंदू महासभा, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, सर्व्हंट्स ऑफ द पीपल सोसायटी
मूळ गावलुधियाना, पंजाब
जातअग्रवाल, जैन
वैवाहिक स्थितीविवाहित
पत्नीचे नाव राधादेवी
लग्न तारीख १८७७
मृत्यू१७ नोव्हेंबर १९२८
मृत्यूचे ठिकाणलाहोर, पंजाब
मृत्यूचे कारणलाठीचार्जमध्ये गंभीर जखमी

कोण होते लाला लजपत राय ?

लाला हे भारताचे एक स्वातंत्र्य सैनिक होते. ज्यांनी भारताला ब्रिटिशांच्या राजवटीपासून मुक्त करण्यासाठी, स्वातंत्र्याचा विडा उचलला होता. भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये लाला यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांना “पंजाब केसरी” म्हणजेच “पंजाबचा सिंह” या नावाने सुद्धा प्रसिद्धी प्राप्त झाली.

Lala Lajpat Rai Information In Marathi

लाला लजपत राय हे बाळ गंगाधर टिळक तसेच बिपिन चंद्र पाल यांच्यासोबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये एक सदस्य म्हणून काम करत होते. लाल बाल पाल या नावांनी त्यांच्या त्रिकूटला प्रसिद्धी प्राप्त होती. पंजाब नॅशनल बँकेची ही लजपत यांचे चांगले संबंध होते. त्यांनी ख्रिश्चनांवर अंकुश ठेवण्यासाठी हिंदू चळवळीची सुद्धा स्थापना केली.

लाला लजपत राय यांचा जन्म कुटुंब प्रारंभिक जीवन

  • लाला यांचा जन्म दि. २८ जानेवारी १८६५ मध्ये पंजाब मधील मोघा या ठिकाणी एका गरीब कुटुंबामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव राधाकृष्ण. राधाकृष्ण हे त्या काळात शिक्षक होते. याचा परिणाम लाला लजपतराय यांच्यावरती झाला.
  • लाला यांच्यावर त्यांच्या वडिलांचा अर्थात राधाकृष्ण यांचा प्रचंड प्रभाव होता. लहानपणापासूनच लजपत राय आहे प्रचंड हुशार व कुशाग्रह बुद्धीचे होते. स्वतःचे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी कायद्याच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केले व एक उत्कृष्ट वकील बनले.
  • काही काळ कायद्यामध्ये त्यांनी उत्तम सराव केला. परंतु त्यांना या कामाचा कंटाळा येऊ लागला. ब्रिटिश न्यायव्यवस्थेबद्दल त्यांच्या मनामध्ये संताप निर्णय निर्माण झाला. म्हणून, त्यांनी वकिली सोडून बँकिंग कडे लक्ष केंद्रित केले.

नक्की वाचा 👉👉महर्षी धोंडो केशव कर्वे यांची माहिती

नक्की वाचा 👉👉लाल बहादूर शास्त्री संपूर्ण माहिती

नक्की वाचा👉👉 रवींद्रनाथ टागोर माहिती मराठी

नक्की वाचा👉👉 स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती मराठी

लाला लजपत राय यांच्या कौटुंबिक माहिती

आईचे नावगुलाब देवी अग्रवाल
वडिलांचे नाव मुन्शी राधाकृष्ण अग्रवाल
पत्नीचे नाव राधादेवी अग्रवाल
भावंडे लाला धनपत राय
अपत्य प्यारेलाल अग्रवाल आणि अमृत राय अग्रवाल , पार्वती अग्रवाल

लाला लजपत राय यांची प्रमुख कामगिरी

  • लजपत राय हे विसाव्या शतकाच्या काळातील भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक वरिष्ठ व प्रमुख नेते होते. लजपतराय यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व हिंदू महासभा तसेच आर्य समाजामध्ये, अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले. लजपतराय हे एक लेखक, पत्रकार, म्हणून कार्यरत होते. तसेच त्यांच्या कामामध्ये “द स्टोरी ऑफ माय डिपॉर्शन” व “अन हॅपी इंडिया” या लेखनाचा समावेश आहे.
Lala Lajpat Rai Information In Marathi
  • लजपतराय यांनी एक महत्त्वाची कामगिरी बजावली, ज्यामध्ये भारतातील शेतकरी व कामगारांच्या हक्कांना प्रगती पदावर आण्यासाठी, त्यांनी ग्रामीण गरिबांच्या हक्काचे खंबीर नेते म्हणून कार्य केले. तसेच शेतकरी व ग्रामीण मजुरांचे, जीवनमान उंचावण्यासाठी लाला लजपत राय हे नेहमीच प्रयत्नशील होते. त्यांनी औद्योगिक कामगारांच्या हक्कांनाही, पाठिंबा दिला तसेच पंजाब व इतर प्रदेशांमध्ये “कामगार संघटना” स्थापन करण्यास मदत केली.
  • १९२० ते १९२२ च्या दरम्याने महात्मा गांधीजींच्या असहकार चळवळीमध्ये, लाला यांनी प्रमुख भूमिका साकारली. महात्मा गांधींच्या मार्गदर्शनाखाली, असहकार चळवळीचे उद्दिष्ट सार्थकी लावण्यासाठी, भारतातील ब्रिटिश राजवटीला अहिंसक मार्गाने हाकलून लावण्यासाठी, लाला लजपत राय हे चळवळीचे खंबीर समर्थक होते.
  • त्यांनी पंजाब प्रदेशांमध्ये चळवळीचे आयोजन करण्यात उत्तम भूमिका साकारली. तसेच लाहोर मध्ये इंडियन नॅशनल कॉलेजची स्थापना करण्यासाठी, लाला यांनी प्रमुख भूमिका निभावली. यामध्ये तरुण भारतीयांना शिक्षण दिले गेले व राष्ट्रवादी विचारांना चालना देण्यास मदत मिळाली.
  • लजपत राय यांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामामध्ये, महत्त्वपूर्ण योगदान दिले. केवळ एवढेच नव्हे तर, स्वदेशीच्या कल्पनेंना चालना देण्यासाठी परदेशी वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी व स्वदेशी उत्पादनांचा वापर वाढवण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले. तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सगळी सक्रियपणे सहभागी झाले व त्यांच्या कार्यकारणीचे त्यानी सदस्यत्व सुद्धा स्वीकारले.
  • लाला लजपत राय यांनी भारतामधील हिंदू राष्ट्रवादी चळवळीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. त्यांनी हिंदू महासभेचे सदस्यत्व स्वीकारले व भारतातील हिंदू अस्मिता व संस्कृतीला प्राधान्य देण्यासाठी, महत्त्वपूर्ण काम केली. तसेच त्यांनी वकिलीचे ज्ञान प्राप्त केले होते, या ज्ञानाच्या जोरावर भेदभावापासून समाजाचे संरक्षण करण्याचा त्यांनी मनोमन प्रयत्न केला.
  • लजपत राय यांनी शिक्षण व महिला हक्कांसाठी, प्रचंड प्रयत्न केले. त्यांनी दयानंद अँग्लोवेदी कॉलेज ट्रस्ट तसेच मॅनेजमेंट सोसायटीचे संस्थापक म्हणून कार्य केले. ज्यांनी भारतामध्ये विविध शाळा व महाविद्यालयाची स्थापना केली. लजपत राय यांनी महिलांच्या शिक्षणासाठी प्रचंड प्रयत्न केला व भारतातील महिलांच्या हक्कांना चालना देण्यासाठी व रूढी परंपरा संपवण्यासाठी सतत तत्पर राहिले.
लाला लजपत राय

लाला लजपत राय बँकर विमा अधिकारी आणि अतिरेकी पक्षाचे नेते झाले

  • लजपत राय यांनी वकिली सोडून, बँकिंग क्षेत्राकडे आवड दाखवली. स्वतःच्या उपजीविकेसाठी त्यांनी बँकिंग क्षेत्रामध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्या काळात बँक भारतामध्ये तितक्याशी लोकप्रिय नव्हत्या. परंतु लजपत राय यांनी त्यांच्यासमोर आलेले हे आवाहन स्वीकारून “पंजाब नॅशनल बँक” व “लक्ष्मी इन्शुरन्स कंपनीची” स्थापना केली.
  • दुसरीकडे काँग्रेसच्या माध्यमातून, त्यांनी इंग्रजांचा विरोध सुरूच ठेवला. त्यांच्या कणखर व्यक्तिमत्वामुळे व स्वभावामुळे “पंजाब केसरीचा” किताब लाला लजपतराय यांनी पटकावला.
  • बाळ गंगाधर टिळक यांच्या नंतर संपूर्ण स्वराज्याची मागणी करणाऱ्या, पहिल्या नेत्यांपैकी लाला यांचे नाव आदराने घेतले जाते. पंजाब मधील सर्वात लोकप्रिय नेता म्हणून लजपत राय यांच्या कडे पहिले जाते.

लाला लजपत राय यांचा आर्य समाज आणि डी. ए. व्हि

  • एक कणखर स्वातंत्र्य सैनिक असण्याबरोबरच, लाला यांनी भारतामध्ये आर्य समाजाच्या प्रसार करण्यास सुरुवात केली व आर्य समाजाच्या चळवळीकडे त्यांनी जास्त कल दर्शवला. त्याचा असा परिणाम झाला की, लवकरच “महर्षी दयानंद सरस्वती” यांच्या समवेत, लाला हे चळवळीचे नेतृत्व करण्यासाठी सरसावले.
  • समाजाने भारतीय हिंदू समाजात प्रचलित असलेल्या. वाईट प्रथा व धार्मिक अंधश्रद्धेवर निर्मूलन आणण्यासाठी व वेदांकडे परत जाण्याचे. आवाहन करण्याचे प्रयत्न केले. त्यावेळी लोकमतच्या विरोधामध्ये उभे राहण्याचे धाडस लाला यांनी दर्शवले.
  • ही गोष्ट त्या काळाची आहे, जेव्हा आर्य समाजवाद्यांना धर्मविरोधी मानले जात असे, परंतु लाला लजपतराय यांनी त्याची अजिबात परवा न करता, त्यांच्या प्रयत्नांनी लोकांना आर्य समाजाकडे वळवले. त्यामुळे आर्य समाज पंजाब मध्ये लवकरच लोकप्रिय झाला.
  • भारतीय शिक्षण क्षेत्रात, लजपत राय यांनी एक महत्त्वाचे कार्य केले. भारतात केवळ पारंपारिक शिक्षणाचे आधिपत्य होते. त्यामुळे, संस्कृत आणि उर्दू हे शिक्षणाचे माध्यम होते. परंतु युरोपियन शैली किंवा इंग्रजी प्रणालीवर आधारित शिक्षणापासून, भारतातील लोके वंचित होती. आर्य समाजाने या दिशेने दयानंद अँग्लो वैदिक शाळा सुरू केल्या. या शाळेचा प्रसार व प्रचारासाठी लाला लजपतराय यांनी अतोनात प्रयत्न केले.
  • पुढे पंजाब, उत्कृष्ट डी.ए.व्ही शाळांसाठी सुद्धा नावाजला जाऊ लागला. या सर्व महत्त्वाच्या कार्यासाठी लजपत राय यांचे योगदान हे अविस्मरणीय आहे.
  • शिक्षण क्षेत्रामध्ये लजपत राय यांनी अजून एक महत्त्वाची भूमिका बजावली. ती म्हणजे, लाहोर मधील डी.ए.व्ही कॉलेज. लजपत राय यांनी या डी.ए.व्ही महाविद्यालयाचे भारतातील सर्वोत्तम शिक्षण केंद्रामध्ये रूपांतर केले.
  • ज्यामध्ये तरुणांनी असहकार आंदोलनात इंग्रजांनी चालवलेल्या कॉलेजेसचा तिरस्कार केला. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज एक वरदानच ठरले. डी.ए.व्ही कॉलेजने बहुतेकांच्या शिक्षणाची उत्तम व्यवस्था केली.
लाला लजपत राय

काँग्रेस आणि लाला लजपत राय

  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सक्रिय सहभाग दर्शवणे, हा लाला लजपत राय यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग होता. १८८८ मध्ये अलाहाबाद येथे काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन भरले व लाला या संघटनेमध्ये सहभागी होण्याची प्रथमच संधी प्राप्त झाली. सुरुवातीच्या काळामध्ये लाला लजपतरायांनी काँग्रेसमध्ये उत्साही कार्यकर्ता म्हणून नाव कमावण्यास सुरुवात केली.
  • परंतु, हळूहळू काँग्रेसच्या पंजाब प्रांताचे सार्वत्रिक प्रतिनिधी म्हणून लाला लजपतराय यांना स्वीकारले गेले. यानंतर १९०६ मध्ये काँग्रेसने राय यांना गोपाळ कृष्ण यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळाचा सदस्य बनवले. हे त्यांच्या संघटनेतील वाढत्या उंचीचे प्रतीक ठरले.
  • परंतु पक्षाच्या या मतामुळे, काँग्रेसमध्ये अव्यवस्था निर्माण झाली. बाळ गंगाधर टिळक व बिपिन चंद्र पाल यांच्या व्यतिरिक्त लाला राय हे एक तिसरे नेते होते, ज्यांना ब्रिटिशांच्या फाशीच्या भूमिकेतून काँग्रेसला उंच करायचे होते.

लाला लजपत राय यांना अटक

  • काँग्रेसचा इंग्रज सरकारच्या विरोधामुळे, इंग्रज सरकारच्या डोळ्यात लजपत राय नेहमीच खूपच असत. त्यामुळे लाला हे काँग्रेस पासून वेगळे व्हावे, अशी इंग्रजांची तीव्र इच्छा होती. परंतु लजपत राय यांचा दर्जा आणि लोकप्रियता पाहता, लजपत राय यांना काँग्रेस पक्षातून वेगळे करणे तितकेसे सोपे नव्हते.
  • १९०७ मध्ये लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यास सुरुवात केली. सरकार हे अशाच संधीच्या शोधामध्ये होते, त्यांनी लाला लजपत राय यांना केवळ अटकच केले नाही तर, त्यांना हद्दपार करून बर्माच्या मंडाले तुरुंगामध्ये डामले. पण सरकारच्या हालचालीवर उलट सुलट परिणाम झाला, आणि लोक रस्त्यावर आले. या लोकांच्या दबावामुळे, ब्रिटिश सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला व लाला लजपत राय पुन्हा एकदा आपल्या लोकांमध्ये परतले व त्यांची मंडाले तुरुंगामधून सुटका झाली.

लाला लजपत राय आणि राष्ट्रवाद

  • लाला यांनी लहानपणापासूनच, भारत मातेच्या सेवेचे स्वप्न मनाशी बाळगले होते. भारत मातेची सेवा करण्यासाठी, लाला लजपत राय हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. ब्रिटिशांच्या धोरणाविरुद्ध पंजाब मधील राजकीय आंदोलनासारख्या अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग दर्शवून, लजपत रायाने ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवला.
  • ब्रिटिशांना धोका असल्याचे पाहून, १९०७ मध्ये ब्रिटिशांनी कोणत्याही खटल्याशिवाय, लाला लजपत राय यांना अटक करणे केले. त्यांच्या विरोधामध्ये पुरेसे पुरावे नसल्यामुळे, लॉर्ड मेंटोने लजपत राय यांना भारतात परतण्याची परवानगी दिली.
  • यानंतर १९२० च्या दरम्याने कलकत्ता विशेष अधिवेशनामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून लाला लजपत राय यांची नियुक्ती करण्यात आली. भारतीय राष्ट्रीय चळवळ तसेच भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे महान प्रेरणादायी नेते म्हणून लाला लजपत राय यांच्याकडे पाहिले जाते.
  • त्यांनी अनेक तरुण भारतीयांना ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी प्रेरित केले. यामुळे चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, यांसारख्या तरुणांनी भारताला इंग्रजांपासून मुक्त करण्यासाठी, आपल्या प्राणाचे बलिदान दिले. लाला लजपत राय यांनी विसाव्या शतकामध्ये अनेक संस्था स्थापन केल्या.
  • महिलांसाठी क्षयरोग रुग्णालय बांधण्यासाठी, त्यांच्या आईच्या स्मरणार्थ त्यांनी ट्रस्टची स्थापना देखील केली. बिपिन चंद्र पाल, बाल गंगाधर टिळक, तसेच अरविंद घोष यांच्यासोबत लाला लजपत राय यांनी राजकारणामधील नकारात्मक बाजू यास कडाडून विरोध केला. मुस्लिम भारत व बिगर मुस्लिम भारत यांच्यामधील संभाव्य संघर्ष समजून घेणाऱ्या काँग्रेसमधील लाला लजपत राय एक नेते होते.

लाला लजपत राय यांचे काँग्रेस आणि होमरूल लीग पासून वेगळे होणे

१९०७ पर्यंत काँग्रेसचा एक भाग लाला यांच्या विचारांशी पूर्णपणे असहमत होता. लाला लजपत राय हे अतिरेकी गटाचे एक भाग समजले जात होते. ज्यांना ब्रिटिश सरकारशी लढून, पूर्ण स्वातंत्र्य मिळवायचे होते. या संपूर्ण स्वराज्याला अमेरिकन, स्वातंत्र्य युद्ध आणि पहिल्या महायुद्धातून बळ प्राप्त झाले व लाला यांनी अॅनी बेझंट सह भारत होमरूलचे मुख्य वक्ते म्हणून काम करण्यास सुरुवात केली. जालियनवाला बागच्या हा घटनेने, त्यांच्यामध्ये ब्रिटिश सरकार विरुद्ध प्रचंड संताप भरला. यादरम्यान काँग्रेसमध्ये महात्मा गांधी हे नेतृत्व करण्यास आले व गांधीजींनी आंतरराष्ट्रीय मंचावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.

१९२० मध्ये गांधीजींनी सुरू केलेल्या, असहकार चळवळीमध्ये लाला लजपत राय यांनी सक्रिय सहभाग दर्शवला, त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. परंतु लजपत राय यांची तब्येत बिघडल्या कारणाने, त्यांना तुरुंगातून सोडून देण्यात आले. यादरम्यान, काँग्रेस सोबत त्यांचे संबंध सतत खराब होत गेले व १९२४ मध्ये लजपत राय यांनी काँग्रेस सोडून, स्वराज्य पक्षात जाण्याचे ठरवले व यानंतर मध्यवर्ती असेंबलीचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु, त्यांना ते सुद्धा सदस्यत्व योग्य वाटले नाही व राष्ट्रवादी पक्षाची त्यांनी स्थापना केली व पुन्हा एकदा विधानसभेचा भाग बनले.

लाला लजपत राय यांचा ब्रिटिशांविरुद्धचा लढा

  • १९२८ मध्ये ब्रिटिश सरकारने सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली, आयोगाची स्थापना केली होती. भारतातील राजकीय परिस्थितीचा अहवाल देण्यासाठी, या आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगामध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. यामुळे भारतीयांमध्ये संतप्त निर्माण झाला व या ब्रिटिश सरकारच्या आयोगावर भारतीयांनी बहिष्कार टाकला.
  • लाला लजपत राय यांनी हजारो लोकांसोबत सायमन परत जा असा नारा लावत, त्यांचा निषेध केला व काळे झेंडे दाखवले. या आंदोलनामध्ये झालेल्या या निषेधामुळे त्या आंदोलनाला एक हिंसक वळण प्राप्त झाले. त्यामुळे पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट, याने लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले. यामध्ये लाला लजपत राय हे प्रचंड गंभीर झाले. गंभीर जखमी झाल्यानंतर सुद्धा लाला लजपत राय यांनी जमावाला संबोधित करत म्हणाले, मी जाहीर करतो की, माझ्यावर झालेला हा प्रहार भारतातील ब्रिटिश राजवटीच्या शव पेटीचा शेवटचा खिळा ठरेल.
  • जालियनवाला बागेमधील इंग्रजांच्या कारस्थानांच्या निषेधार्थ लाला लजपत राय यांनी आवाज उठवला. १९७० च्या दरम्याने महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या सहकार चळवळीमध्ये लालाजींनी सक्रिय सहभाग दर्शवून, चौरी चौरा घटनेनंतर महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलन करण्यास सुरुवात केली. लालाजींनी या निर्णयावर कठोर टीका केली व काँग्रेस स्वतंत्र पक्षाची स्थापना केली.

लाला लजपतराय यांचे सामाजिक कार्य

लाला लजपतराय आणि दुष्काळग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी व त्यांना मिशनरीच्या तावडीतून वाचवण्यासाठी १८९७ मध्ये “हिंदू रिलिफ चळवळ” सुरू केली. यानंतर १९२१ मध्ये सर्वांत ऑफ पीपल सोसायटीची स्थापना केली.

लाला लजपतराय यांची संस्थात्मक कार्य

लाला लजपतराय यांनी स्थापन केलेल्या, आर्य गॅजेटचे ते संपादक होते. यानंतर १८९४ मध्ये त्यांनी पंजाब नॅशनल बँकेचे सह संस्थापक पद भूषवले. हिसार बार समाज, हिस्सार काँग्रेस, राष्ट्रीय डी.ए.व्ही व्यवस्थापन समितीच्या, अनेक विविध संस्थांमध्ये व संघटनांमध्ये त्यांनी उत्तम कामगिरी केली व यांची स्थापना लाला लजपत राय यांनी केली.

लाला लजपत राय यांनी लिहिलेले साहित्य

लाला लजपत राय यांनी लिहिलेल्या महत्त्वाच्या साहित्यकृतीमध्ये, इंग्लंडचे भारतावरील ऋण, यंग इंडिया, जपानची उत्क्रांती, भारताची स्वातंत्र्याची इच्छा, भगवद्गीतेचा संदेश, भारतातील राष्ट्रीय शिक्षणाची समस्या, भारतातील राजकीय भविष्य, उदासीन चष्मा व अमेरिकेचे प्रवास वर्णन याचा समावेश केला जातो.

लाला लजपतरायांनी लिहिलेली पुस्तके

  • मॅझिनी, गॅरिबाल्डी, शिवाजी महाराज यांची उर्दू भाषेत लिहिलेली संक्षिप्त चरित्रे 
  • यंग इंडिया
  • महान अशोक
  • श्रीकृष्ण आणि त्याची शिकवण
  • द कलेक्टेड वर्क्स ऑफ लाला लजपत राय. संपादक: बी.आर.नंदा
  • लाला लजपत राय रायटिंग ॲन्ड स्पीचेस

लाला लजपतराय यांच्याबद्दल थोडक्यात माहिती

  • लाला लजपत राय हे भारतातील महान स्वातंत्र्य सैनिकांपैकी एक महत्त्वाचे सैनिक होते.
  • लजपतराय यांचा हिंदू महासभेशी संबंध होता.
  • त्यांनी अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये आंदोलन सुद्धा केले होते.
  • लाला लजपतराय यांना “पंजाब केसरी” व “पंजाबचा सिंह” म्हणून संबोधले जाते.
  • लाला लजपतराय आणि स्वामी दयानंद सरस्वती यांच्या प्रभावाने लाहोर मधील आर्य समाजामध्ये सक्रिय सहभाग दर्शवला.
  • लाहोरच्या शासकीय महाविद्यालयातून लाला लजपतराय यांनी वकिलीचे शिक्षण घेतले.
  • लजपत राय यांचा असा विश्वास होता की हिंदू धर्माचा आदर्शवाद राष्ट्रवादासह एकत्रितपणे धर्मनिरपेक्ष राज्य स्थापन करेल.
  • बाळ गंगाधर टिळक, बिपिन चंद्र पाल, यांच्यासोबत लाला लजपतराय यांनी अतिरेकी नेत्याची त्रिकूट तयार केली ज्याला लाल, बाल, पाल, म्हणून संबोधले गेले.

लाला लजपत राय यांची घोषणा व मृत्यूचे सत्य

  • महात्मा गांधींनी भारतीय जनते सोबत बोलण्यासाठी आलेल्या सायमन कमिशनला विरोध करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा एक मोठी घटना घडली,लाला लजपत राय यांनी सायमन कमिशन जिथे गेले, तिथे “सायमन गो बॅकच्या” घोषणा देण्यात आल्या.
  • दिनांक ३० ऑक्टोबर १९२८ रोजी आयोग लाहोरला पोहोचला. त्यावेळी लजपत,राय यांच्या नेतृत्वाखाली, प्रत्येक गटाने “सायमन गो बॅकचा” नारा देत, शांततेने निषेध नोंदवला. त्यानंतर ब्रिटिश पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला.
  • एका ब्रिटिश अधिकाऱ्याने लालाजींच्या डोक्यावर जोराने लाठीचा प्रहार केला. त्यात लालाजी म्हणाले, “माझ्या अंगावर पडलेली प्रत्येक काठी, ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीतील खिळ्यासारखी काम करेल.
  • डोक्याला झालेल्या प्रचंड दुखापतीमध्येच, लाला लजपतराय यांचा तिथे मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश हा संतप्त झाला व या रागाचा परिणाम म्हणून, शिवराम राजगुरू, सुखदेव थापर व बिग भगतसिंग यांनी ब्रिटिश पोलीस अधिकारी सॉंडर्सची हत्या केली.
  • लाला लजपत राय भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक वीर पुरुष होते, ज्यांनी स्वतःचे उभे आयुष्य देशासाठी समर्पित केले अशा या महान व संघर्ष नेत्याला कोटी कोटी प्रणाम.

लाला लजपत राय विचार

  • पराभव आणि अपयश हे विजयाच्यादिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असते- लाला लजपत राय
  • सत्याची उपासना करुनही व्यक्तीगत लाभासाठी निंदा करण्याऐवजी परिश्रम करा. प्रामाणीक राहा- लाला लजपत राय
  • लहानांसाठी दूध, प्रौढांसाठी भोजन आणि सर्वांसाठी शिक्षण आवश्यक असते – लाला लजपत राय
  • इतरांवर नव्हे, स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा. मग पाहा यश कसे मिळते- लाला लजपत राय
  • देशभक्तीचे निर्माणकार्य न्याय आणि सत्याच्या मार्गानेच पुढे जाऊ शकते- लाला लजपत राय

लाला लजपत राय यांचा व्हिडीओ

FAQ

१. लाला लजपत राय यांच्या जीवनातील सर्वात महत्वाची घटना कोणती होती?

दिनांक ३० ऑक्टोबर १९२८ रोजी आयोग लाहोरला पोहोचला. त्यावेळी लजपत,राय यांच्या नेतृत्वाखाली, प्रत्येक गटाने “सायमन गो बॅकचा” नारा देत, शांततेने निषेध नोंदवला. त्यानंतर ब्रिटिश पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला.

२. लाला लजपत राय का प्रसिद्ध आहेत?

लाला लजपत राय कणखर व्यक्तिमत्वामुळे व स्वभावामुळे “पंजाब केसरीचा” किताब लाला लजपतराय यांनी पटकावला.लाला लजपतराय यांना “पंजाब केसरी” व “पंजाबचा सिंह” म्हणून संबोधले जाते.

३. लाला लजपत राय यांची प्रसिद्ध घोषणा कोणती?

महात्मा गांधींनी भारतीय जनते सोबत बोलण्यासाठी आलेल्या सायमन कमिशनला विरोध करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा एक मोठी घटना घडली,लाला लजपत राय यांनी सायमन कमिशन जिथे गेले, तिथे “सायमन गो बॅकच्या” घोषणा देण्यात आल्या.

४. लाला लजपत राय यांचा मृत्यू केव्हा व कसा झाला?

एका ब्रिटिश अधिकाऱ्याने लालाजींच्या डोक्यावर जोराने लाठीचा प्रहार केला.डोक्याला झालेल्या प्रचंड दुखापतीमध्येच, लाला लजपतराय यांचा दिनांक ३० ऑक्टोबर १९२८ रोजी मृत्यू झाला.

५. पंजाबचा सिंह कोणाला म्हणतात?

लाला लजपत राय यांना पंजाबचा सिंह म्हटले जाते.

६. लाला लजपत राय यांचे सहकारी कोण होते?

बाळ गंगाधर टिळक, बिपिन चंद्र पाल, यांच्यासोबत लाला लजपतराय यांनी अतिरेकी नेत्याची त्रिकूट तयार केली ज्याला लाल, बाल, पाल, म्हणून संबोधले गेले.

७. लाला लजपत राय हे समाजसुधारक आहेत का?

लाला लजपतराय आणि दुष्काळग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी व त्यांना मिशनरीच्या तावडीतून वाचवण्यासाठी १८९७ मध्ये “हिंदू रिलिफ चळवळ” सुरू केली. यानंतर १९२१ मध्ये सर्वांत ऑफ पीपल सोसायटीची स्थापना केली.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणस महान नेते लाला लजपत राय यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला, कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment