सरोजिनी नायडू माहिती मराठी Sarojini Naidu Information In Marathi

सरोजिनी नायडू या एक राजकीय कार्यकर्त्या आणि कवियित्री होत्या. नागरी हक्क, महिला मुक्ती, आणि साम्राज्यवाद विरोधी, विचारांच्या समर्थक वसाहतवादी राजवटी पासून, भारताच्या स्वातंत्र्याच्या लढात त्या एक महत्त्वाची व्यक्ती होत्या.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास सरोजिनी नायडू यांबद्दल माहिती दिली आहे.हा लेख तुम्ही सविस्तर वाचवा.

Table of Contents

सरोजिनी नायडू माहिती मराठी | Sarojini Naidu Information In Marathi

पूर्ण नाव सरोजिनी चट्टोपाध्याय नायडू
जन्मतारीख १३ फेब्रुवारी १८७९
जन्मस्थळ हैदराबाद
आईचे नाव वरद सुंदरी देवी
वडिलांचे नाव डॉ अघोरनाथ चट्टोपाध्याय
पतीचे नाव डॉ गोविंद राजुलू नायडू
अपत्य जयसूर्य, पद्मजा, रणधीर आणि लीलामणी
महत्वाची पुस्तके गोल्डन थ्रेशोल्ड बोर्ड ऑफ टाइम ब्रोकन विंग
शाळामद्रास किंग्ज कॉलेज लंडन गॉर्टन कॉलेज केंब्रिज विद्यापीठ
मृत्यू २ मार्च १९४९

सरोजिनी नायडू यांचा जन्म व बालपण

सरोजिनी यांचा जन्म १३ फेब्रुवारी १८७९ रोजी हैदराबाद या ठिकाणी झाला. त्यांचे वडील अघोरीनाथ चट्टोपाध्याय व आई वरद सुंदरी देवी.

Sarojini Naidu Information In Marathi

सरोजिनी यांचे मूळ घर ब्राह्मणगाव, विक्रमपूर, ढाका, बंगाल प्रांत येथे होते. त्यांचे वडील हे एक बंगाली ब्राह्मण होते. हैदराबाद या ठिकाणी त्यांनी कॉलेजचे प्राचार्य म्हणून कामकाज पाहिले.

बालपणापासूनच सरोजिनी हा अतिशय कुशाग्र बुद्धीच्या विद्यार्थिनी होत्या. त्यांना उर्दू, तेलगू, इंग्लिश, बांगला, पारसी, इत्यादी भाषा अवगत होत्या. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी सरोजिनी नायडू यांनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली.

व मद्रास प्रेसिडेन्सी मध्ये त्या प्रथम आल्या. देशाकरिता स्वतःला समर्पित करणाऱ्या, महान क्रांतिकारी सरोजिनीने गणितज्ञ व वैज्ञानिक व्हावं असं, त्यांच्या वडिलांची म्हणजेच अघोरीनाथ चट्टोपाध्याय यांची तीव्र इच्छा होती.

परंतु नायडू यांना लहानपणापासूनच कविता लिहिण्याचा छंद होता. कविता लिहिण्याची ओढ त्यांना त्यांच्या मातेकडूनच मिळाली. लहानपणी त्यांनी तब्बल तेराशे ओळींची कविता लिहिली होती.

सरोजिनी नायडू यांचे कुटुंब

  • नायडू यांचे वडील अघोरीनाथ चट्टोपाध्याय एक वैज्ञानिक आणि शिक्षणतज्ञ, डॉक्टर, होते. हैदराबाद या ठिकाणी निजाम कॉलेजची नायडू यांच्या वडिलांनी स्थापना केली होती.
Sarojini Naidu
  • पुढे त्यांना कॉलेजमध्ये प्रिन्सिपल पदावरून कमी करण्यात आले व त्यानंतर त्यांनी नॅशनल काँग्रेस हैदराबादचे पहिले सदस्यत्व स्वीकारले. स्वतःची नोकरी सोडून स्वातंत्र्यसंग्रामामध्ये अघोरीनाथ यांनी स्वतःला झोकून दिले.
  • स्वातंत्र्य सेनानी सरोजिनी यांच्या मातेचे नाव वरद सुंदरी देवी असे होते. व त्यांची आई बंगाली भाषेमध्ये कविता लिहत असे. सरोजिनी नायडू यांना एकूण आठ भावंडे होती. त्यामध्ये सरोजिनी या सर्वात मोठ्या होत्या.
  • त्यांचे एक भाऊ वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय क्रांतिकारी होते. त्यांनी बर्लिन कमिटी मध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका बजावली होती. १९३७ ला वीरेंद्रनाथ चट्टोपाधाय यांना इंग्रज अधिकाऱ्याने मारून टाकले.
  • सरोजिनी यांचे दुसरे बंधू हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय एक प्रसिद्ध कवी, कथाकार व कलाकार होते. याव्यतिरिक्त ते अतिशय सुंदर नाटक सुद्धा लिहीत असत.
  • त्यांची बहीण सुनालिनी देवी ह्या एक उत्तम नृत्यांगणा व अभिनेत्री होत्या.

सरोजिनी नायडू यांचे शिक्षण

नायडू या कविता व त्यांच्या लिखाणांनी प्रत्येकाला प्रभावित करत असत. त्यांच्या कवितेने हैदराबादचे निजाम देखील प्रभावित झाले होते.

त्यांनी नायडू यांना विदेशात अध्ययन करण्याकरिता शिष्यवृत्ती प्रदान केली. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी नायडू ज्यावेळी इंग्लंड येथे गेल्यात, तेव्हा त्यांनी प्रथम “किंग्स कॉलेज लंडन” येथे प्रवेश घेतला.

त्यानंतर त्यांनी केंब्रिजच्या ब्रिटन कॉलेजमधून शिक्षण घेतले. त्या ठिकाणी त्यांची भेट त्या काळातील इंग्लिश चे प्रसिद्ध कवी अर्थन सायमन आणि एंडमंड गोसे यांच्याशी झाली.

सरोजिनींना भारतीय विषयांना लक्षात ठेवत लिखाण करण्यास व डेक्कनची भारतीय कवियित्री होण्याचा सल्ला दिला गेला.

त्यानंतर सरोजीनिनी भारत देशांमधील उंच उंच पर्वत, अथांग नद्या, पवित्र मंदिरे, आणि सामाजिक बाबींना त्यांच्या कवितांमधून रचून लोकांसमोर प्रकट केले.

सरोजिनी नायडू यांचा विवाह

भारताच्या महान कवियीत्री, थोर लेखिका, सरोजिनी ज्यावेळी त्यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये ग्रहण करत होत्या, त्या दरम्यान त्यांची भेट गोविंद राजुल नायडूं यांच्याशी झाली. त्यावेळेस त्या त्यांच्या प्रेमात पडल्या. नायडू हे त्यावेळी इंग्लंड येथे फिजिशियन होण्याकरिता शिक्षण घेण्यास आले होते.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर ज्यावेळी गोविंद नायडू भारतात परतले, त्यावेळी त्यांनी आपल्या परिवारांच्या संमतीने वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी सरोजिनी नायडूशी विवाह संपन्न केला.

१९९८ रोजी त्यांचा विवाह ब्राम्हो मॅरेज ॲक्ट अंतर्गत मद्रास येथे संपन्न झाला. सरोजिनी यांचा विवाह आंतरजातीय होता व त्या काळामध्ये आंतरजातीय विवाह करण्यास बंधने होती. हा विवाह एखाद्या गुन्ह्यापेक्षा कमी समजला जात नसे, त्यांनी उचललेले हे एक क्रांतिकारी पाऊल होते.

यासाठी त्यांना फार संघर्ष सुद्धा करावा लागला. परंतु त्यांच्या वडिलांनी समाजाची चिंता न करता आपल्या निर्भय व सुशिक्षित मुलीला अर्थात सरोजिनी यांना त्यांचा निर्णय घेण्यास मदत केली.

सरोजिनी यांना चार अपत्य आहेत. ज्यांचे नाव जयसूर्या, पद्यजा, रणधीर, लीलामणी, असे आहे. सरोजिनींची कन्या पद्यजा ही सरोजिनी नायडू प्रमाणेच एक कवियित्री आहे. शिवाय त्या राजकारणामध्ये सुद्धा उतरल्या व १९६१ ला त्या पश्चिम बंगालच्या गव्हर्नर देखील होत्या.

सरोजिनी नायडू यांची राजकीय कारकीर्द

सरोजिनी यांनी राजकीय कारकर्दीमध्ये, महत्त्वाची भूमिका बजावली. बंगालच्या फाळणीच्या वेळी म्हणजेच १९०५ मध्ये सरोजिनी नायडू भारतीय राष्ट्रीय चळवळीमध्ये त्या सामील झाल्या.

या चळवळीच्या दरम्याने त्यांना अनेक विविध महान व्यक्तिमत्व मिळालेत, ज्यामध्ये गोपाळ कृष्ण गोखले, रवींद्रनाथ टागोर, मोहम्मद अली जिना, एनी बेझंट, सीपी रामास्वामी अय्यर, गांधीजी, जवाहरलाल नेहरू, इत्यादी.

या लोकांच्या सानिध्याने त्यांच्या मध्ये स्वातंत्र्य व राजकीय गोष्टींची प्रभावित होऊन, सरोजिनी यांनी त्यांची राजकीय कारकीर्द सांभाळली.

सरोजिनी नायडू यांचे व्यक्तिमत्व

सरोजिनी या विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतामधील एक महत्त्वाच्या राजकीय व्यक्तिमत्व होत्या. नायडूंनी महिलांच्या हक्कासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यांनी भारतातील महिलांच्या सक्षमीकरणाकरिता महत्त्वाची कारकीर्द बजावली.

१९२५ च्या दरम्याने सरोजिनी नायडू यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपदी निवड निवडण्यात आली. यानंतर सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये गांधीजींसोबत नायडू यांना तुरुंगामध्ये ठेवण्यात आले.

सरोजिनी नायडू एक स्वातंत्र्यसैनिक

नायडू या स्वातंत्र्यसैनिक होत्या. त्यांनी ब्रिटिश सरकारच्या रौलट कायद्याच्या विरोधात जाऊन लढा दिला. ज्यामुळे त्यांना राजद्रोहीची सामग्री बाळगणे, बेकायदेशीर ठरले. नायडू या गांधींच्या असहकार आंदोलनामध्ये सुद्धा सामील झालेल्या पहिल्या लोकांपैकी एक होत्या.

त्यांनी खिलाफत मुद्दा, सत्याग्रह प्रतिज्ञा, साबरमती करार, सविनय कायदेभंग, सारख्या चळवळीसह अनेक निषेध यांमध्ये सक्रिय सहभाग दर्शवला.

जेव्हा गांधीजींना सॉल्ट मार्च ते दांडी नंतर ताब्यात घेण्यात आले. तेव्हा इतर महान व्यक्तिमत्त्वांसमवेत सरोजिनी नायडू यांनी १९३० मध्ये सत्याग्रहाचे नेतृत्व सुद्धा केले.

१९३१ मध्ये ब्रिटिश सरकारशी गोलमेज चर्चेत सक्रिय सहभाग दर्शवण्यासाठी, सरोजिनी नायडू गांधीजींसोबत लंडनला गेल्या. स्वातंत्र्याच्या लढ्यात व राजकीय सहभागामुळे, नायडू यांना १९३०, १९३२, १९४२ च्या दरम्यान तुरुंगवास भोगावे लागले.

सरोजिनी नायडू यांची मिठाच्या सत्याग्रहातील भूमिका

मिठाच्या सत्याग्रहात नायडू यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ब्रिटीश मीठ कराच्या विरोधात महात्मा गांधींनी  1930 मध्ये, दांडी मार्च काढला, त्यावेळी नायडूंनी या मोहिमेला सक्रिय पाठिंबा दिला.

अनेक मिठाच्या मोर्च्यांचे नेतृत्व करत अनेक निषेधांमध्ये भाग घेतला, असंख्य भारतीयांना स्वातंत्र्य लढ्यात सामील होण्यासाठी प्रेरित केले.

सार्वजनिक मुत्सद्देगिरी आणि आंतरराष्ट्रीय संबंध

पूर्व आफ्रिकन इंडियन काँग्रेसच्या अध्यक्षपदी नायडू यांची नियुक्ती करण्यात आली, जिथे त्यांनी आफ्रिकेतील भारतीय स्थलांतरितांच्या हक्कांसाठी वकिली केली. तिची शक्तिशाली भाषणे आणि मुत्सद्दीपणाच्या कौशल्यांमुळे भारताच्या स्वराज्याच्या लढ्याला आंतरराष्ट्रीय सहानुभूती आणि समर्थन मिळण्यास मदत झाली.

सरोजिनी नायडू यांचा तुरुंगवास आणि संघर्ष

सरोजिनी यांना त्यांच्या संपूर्ण राजकीय कार्यकाळात ब्रिटीश अधिकाऱ्यांकडून तुरुंगवास भोगावा लागला. भारताच्या स्वातंत्र्याबद्दलची तिची तळमळ आणि प्रतिकूल परिस्थितीतही तिची निर्भयता यामुळे तिला स्वातंत्र्य चळवळीतील एक जबरदस्त व्यक्तिमत्त्व बनवले.

तुरुंगात वेळ घालवल्यानंतरही, अडचणींचा सामना करून ती अविचल राहिली, तसेच भारताच्या मुक्तीसाठी तिने आपले प्रयत्न चालू ठेवले.

महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कार्य 

महिला अधिकार आणि सक्षमीकरणाच्या सरोजिनी वकिल होत्या. त्यांनी महिलांना राष्ट्रवादी चळवळीत सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले.

महिलांच्या प्रगतीचे आणि मुक्तीचे प्रतीक म्हणून, तिने पारंपारिक अडथळे तोडले आणि त्या काळात समाजात प्रचलित असलेल्या लैंगिक रूढींना उद्ध्वस्त केले.

1917 मध्ये वुमेन्स इंडियन असोसिएशन (डब्ल्यूआयए) ची स्थापना केली, ज्याने महिलांचे हक्क आणि सामाजिक सुधारणांना पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

महात्मा गांधी आणि सरोजिनी नायडू  

१९४२ च्या अटकेमुळे त्यांना २१ महिन्यांची शिक्षा झाली. “ऑल इंडिया होमस्टेट” काँग्रेसच्या प्रतिनिधी म्हणून नायडू यांनी १९१९ मध्ये इंग्लंडला जाण्याचे ठरवले.

१९२४ च्या दरम्याने त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पूर्व आफ्रिकन भारतीय काँग्रेसच्या दोन प्रतिनिधींपैकी एक महत्त्वाच्या प्रतिनिधी होत्या.

महात्मा गांधी आणि सरोजिनी नायडू  

भारतीय राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी, नायडू यांची निवड करण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्याच्या अहिंसवादाचे लहान-मोठे मुद्दे जाणून घेण्यासाठी, नायडू यांनी अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन केले. महात्मा गांधीजींच्या तत्त्वात तत्त्वज्ञानाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सरोजिनींनी युरोप व युनायटेड स्टेट्स मध्ये प्रवास सुद्धा केला.

सरोजिनी नायडू काँग्रेस अध्यक्ष झाल्या

सरोजिनी यांनी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सीपी रामास्वामी अय्यर, आणि मोहम्मद अली जिना या महान व्यक्तिमत्त्वांची भेट झाल्यानंतर, त्यांच्या उत्साहवर्धक वातावरणामुळे नायडू यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेता बनवण्यात आले.

सरोजिनी यांना भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासामधील एक अग्रगण्य व्यक्तीमत्व म्हणून संबोधले जाते.

सरोजिनी नायडू यांची उपलब्धी

नायडू या त्यांच्या गीतात्मक कवितेसाठी व लिखाणासाठी प्रसिद्ध आहेत. भारतीय राष्ट्रवादी चळवळीमधील त्यांच्या महत्त्वाच्या कामगार कामगिरीमुळे, त्यांना प्रसिद्धी मिळाली. नायडू यांच्या बऱ्याच कविता गाण्यांमध्ये सुद्धा बदलल्या गेल्या.

कविता लिहिण्यासाठी आजूबाजूचा निसर्ग, सभोवतालच्या लोकांमध्ये व संस्कृती द्वारे त्यांना प्रेरणा मिळत गेली. सरोजिनी नायडू यांचे ” गोल्डन थ्रेशोल्ड ” कवितेचे पुस्तक सन १९०५ मध्ये प्रकाशित करण्यात आले.

सरोजिनी प्रचंड मोठ्या देशभक्त होत्या. ज्यांनी देशाबद्दलचे प्रेम त्यांच्या लेखनामधून, जनसामान्यांपर्यंत पोहोचवले. यानंतर त्यांनी “द बर्ड ऑफ टाईम” व “द ब्रोकन विंग्ज” हे दोन खंड प्रकाशित केले.

या खंडांना भारत तथा इंग्लंड या दोन्ही देशांमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. कविते व्यतिरिक्त महिला सक्षमीकरण व राजकीय समस्यांसारख्या सामाजिक विषयांवर सुद्धा नायडू यांनी निबंध व लेख यांचे लेखन केले आहे.

सरोजिनी नायडू यांनी राज्यपाल पद स्वीकारले

देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशाला एका चांगल्या लक्षात पर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व नेत्यांचे कार्य चालू होते. आजपर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संघर्ष चालू होता, परंतु आता देशाला उत्तम विकसित करण्यासाठी व एक उत्तम राष्ट्र निर्माण करण्याचे, उत्तरदायित्व प्रत्येक नेत्याच्या खांद्यावरती आले होते.

काही नेत्यांना सरकारी तंत्र व प्रशासनामध्ये नोकरी दिल्या गेल्या. यामध्ये नायडू ह्या एक होत्या. सरोजिनी यांना उत्तर प्रदेशचे राज्यपाल नियुक्त केले गेले.

उत्तर प्रदेश हा जनसंख्याच्या दृष्टीने सगळ्यात मोठा प्रांत आहे. राज्यपाल पदाचा स्वीकार करतेवेळी, सरोजिनी म्हणाल्या, “मी स्वतःला कैदे मध्ये ठेवलेल्या एका जंगली पक्षाप्रमाणे अनुभव करत आहे. परंतु प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरूंच्या इच्छेचे पालन करत, मी हे राज्यपाल पद स्वीकारत आहे.

सरोजिनी नायडू यांनी केलेले राष्ट्रीय आंदोलन

सरोजिनी यांनी १९०५ मध्ये झालेल्या बंगालच्या फाळणीनंतर, भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. थोर व्यक्तिमत्व गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सानिध्यामध्ये नायडू आल्यावर त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रिय सहभाग दर्शवला.

भारतीय राष्ट्रवादी संघर्षाची ध्वजवाहक म्हणून नायडू यांनी युनायटेड स्टेट्स व युरोपियन देशांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवास केला.

सरोजिनी नायडू यांच्या वाढदिवसाला महिला दिन का साजरा केला जातो ?

सरोजिनी यांची जयंती संपूर्ण भारत देशामध्ये प्रतिवर्षी १३ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. हा दिवस “राष्ट्रीय महिला दिन” म्हणून साजरा केला जातो. आपल्या भारत देशातील महिलांसाठी सक्षमीकरण करण्यासाठी सरोजिनी हा एक प्रेरणास्थान होत्या.

ज्यांनी महिलांच्या मुक्तीसाठी सखोलपणे कार्य केले बंड केले व त्यांच्या जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. १९१७ च्या दरम्याने वुमन्स इंडियन असोसिएशनची नायडू यांनी स्थापना केली. ज्यामध्ये त्यांनी महिलांना मत आणि विधान पद धारण करण्याचा अधिकार प्राप्त करून दिला.

भारतातील महिलांसाठी नायडू यांनी दिलेली एक महत्त्वाची ही कामगिरी होती. त्यामुळे नायडू यांचा जन्मदिन १३ फेब्रुवारी हा राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो.

सरोजिनी नायडू यांना भारताची कोकिळा का म्हणतात ?

सरोजिनी यांनी स्वातंत्र्य चळवळीतील राजकीय कार्यकर्त्या तसेच कवयित्री होत्या. त्यांना भारताच्या कोकिळा म्हणून संबोधले जाई. सरोजिनी नायडू या एक महान स्त्री होत्या.

सरोजिनी नायडू अहिंसा चळवळीत सक्रिय सहभागी

सरोजिनी यांनी महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, गोपाळ कृष्ण गोखले, सरलादेवी चौधरी, यांच्याशी अतिशय कनिष्ठ संबंध निर्माण केले. १९१७ नंतर गांधीजींच्या ब्रिटिश राजवटी विरुद्धच्या अहिंसक प्रतिकारच्या सत्याग्रह चळवळीमध्ये, नायडू सक्रिय सहभागी झाल्या.

ब्रिटिश राजवटी पासून देशाला मुक्त करण्याच्या प्रयत्नामध्ये, “ऑल इंडिया होमरूल लीगचा” एक भाग म्हणून सरोजिनी यांनी १९१९ मध्ये लंडनला प्रवास केला. त्यानंतर त्यांनी भारतातील असहकार चळवळीमध्ये सक्रिय सहभाग दर्शवला. १९२४ च्या दरम्याने नायडूंनी पूर्व आफ्रिकन इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले.

सरोजिनी नायडू यांचा मृत्यू

उत्तर प्रदेशाच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून, सरोजिनी ओळखल्या जातात. सरोजिनी नायडू यांचे ०२ मार्च १९४९ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने लखनऊ या ठिकाणी निधन झाले.

त्यांनी त्यांचे गौरवशाली जीवन त्यांच्याच शब्दानुसार जगले. माझ्या हातातून जोपर्यंत रक्त वाहत आहे, तोपर्यंत मी स्वातंत्र्याचे ध्येय सोडणार नाही. असे सरोजिनी नायडू यांनी ठणकावून सांगितले होते.

सरोजिनी नायडू यांचा वारसा

सरोजिनी नायडू म्हणतात, “मी फक्त एक कवियीत्री आणि एक स्त्री आहे. परंतु एक स्त्री म्हणून मी तुम्हाला धैर्य, विश्वासाची शस्त्रे प्रदान करू इच्छिते. याव्यतिरिक्त मी एक कवी म्हणून गाणे व आवाजाचा झेंडा उंचावू शकते.

तुम्हाला तुमच्या गुलामगिरी मधून, जागरूक करण्यासाठी ज्वाला मी कशी प्रज्वलित करू? नामपल्ली येथील त्यांचे बालपणीचे निवासस्थान त्यांच्या कुटुंबाने हैदराबाद विद्यापीठाला दिले होते.

व सरोजिनी नायडूंच्या १९०५ च्या प्रकाशानंतर त्यांचे नाव गोल्डन थ्रेशोल्ड असे ठेवण्यात आले. नाइटिंगेल ऑफ इंडिया चा सन्मान करण्यासाठी हैदराबाद विद्यापीठाने त्यांच्या ललित कला व संप्रेषण शाळेचे नाव बदलून सरोजिनी नायडू स्कूल ऑफ आर्ट्स अँड कम्युनिकेशन असे केले.

सरोजिनी नायडू विषयी थोडक्यात महत्वपूर्ण माहिती

सरोजिनी नायडू यांनी देशसेवा, समाजसेवा, इत्यादी. अगदी मनोभावे केल्या. सरोजिनी नायडूंनी गोखल्यांना त्यांच्या गुरुस्थानी मानले. व महात्मा गांधींचे नेतृत्व पूर्णतः त्यांनी स्वीकारले.

हैदराबादमध्ये ज्यावेळी प्लेगची साथ पसरत होती, त्या काळात त्यांनी फार परिश्रम घेऊन, जनसामान्य जनतेला सर्वतोपरी मदत केली. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर सरोजिनी नायडू पूर्णतः गांधीवादी झाल्या. त्यांचा पेहराव, राहणीमान यामध्ये अमुलाग्र बदल येऊ लागला.

त्यांनी आपले वास्तव्य हैदराबाद मधून मुंबईमध्ये स्थापन केले. त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये सभासद म्हणून निवडून आल्या, व पुढे प्रांतिक काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या.

स्त्रियांना सक्षमीकरण करण्यासाठी व स्त्रियांना त्यांचा न्याय प्राप्त करून देण्यासाठी, सरोजिनी नायडू यांनी अतोनात कष्ट केले. त्यामुळे त्यांचा जन्म दिवस हा राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो.

सरोजिनी नायडू यांनी लिहिलेल्या कविता

ओ! मी पूर्व आणि पश्चिम दिशा शोधल्या आहेत,
माझ्या अंगावर अनमोल दागिने आहेत
आणि यातून माझ्या तुटलेल्या पोटातून
कर्तव्याच्या मार्गावर आणि सर्वनाशाच्या सावलीत अनेक मुले जन्माला आली आहेत.
ते थडग्यात मोत्यासारखे जमा झाले.


ते पर्शियन लाटांवर शांत झोपलेले आहेत,
ते इजिप्तच्या वाळूवर पसरलेल्या कवचासारखे आहेत,
ते पिवळे धनुष्य आणि शूर तुटलेले हात आहेत
ते अचानक जन्मलेल्या फुलांसारखे
फुलतात ते फ्रान्सच्या रक्ताने माखलेल्या दलदलीत अडकले आहेत


तू माझ्या अश्रूंच्या वेदना मोजू शकतोस की
माझ्या घड्याळाची दिशा समजू शकतोस?
किंवा माझ्या हृदयाच्या तुटलेल्या अभिमानात
आणि प्रार्थनेच्या वेदनांमध्ये गुंतलेली आशा पहा?
आणि मला दूरवर दिसणारी दुःखी भव्य दृष्टी
विजयाच्या फाटलेल्या लाल पडद्यावर लिहिलेली आहे?
जेव्हा द्वेषाचा दहशत आणि आवाज संपतो


आणि जीवन शांततेच्या धुरीवर नवीन स्वरूपात फिरते,
आणि तुमचे प्रेम संस्मरणीय धन्यवाद देईल,
ज्यांनी शौर्याने लढा दिला त्या सोबत्यांना,
माझ्या शहीद मुलांचे रक्त लक्षात ठेवा!

सरोजिनी नायडू यांनी लिहिलेली पुस्तके

  • १९०५ सोनेरी उंबरठा
  • १९१२ वेळेचे पक्षी : जीवन मृत्यू आणि वसंत ऋतुची गाणी
  • १९१५ – १९१६ द ब्रोकन विंग्ज : प्रेम मृत्यू आणि नशिबाची गाणी
  • १९१९ सरोजिनी नायडू यांची भाषणे आणि लेखन
  • १९१२ हैदराबादच्या बाजारामध्ये
  • १९१३ सरोजिनी नायडू यांची निवडक कविता आणि गद्य पुस्तक
  • १९१२ द बर्ड ऑफ टाईम – सॉंग ऑफ लाईफ अँड द स्प्रिंग : मेरी सी स्टर्जन

सरोजिनी नायडू यांचे पुरस्कार आणि कर्तृत्व 

  • सरोजिनी नायडू यांना १९२८ मध्ये हिंद केसरी पदक मिळाले.
  • सरोजिनी नायडू या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी आणि राज्याच्या राज्यपालपदावर विराजमान झालेल्या पहिल्या महिला होत्या.
  • भारत सरकारने त्यांच्या जयंतीनिमित्त 13 फेब्रुवारी 1964 रोजी 15 पैशांचे टपाल तिकीट जारी केले.
सरोजिनी नायडू 15 पैशांचे टपाल तिकीट
  • द गोल्डन थ्रेशोल्ड, द बर्ड ऑफ टाइम, द ब्रोकन विंग्स, द स्पेक्टेड फ्लूट: सॉन्ग ऑफ इंडिया, आणि इतर पारितोषिके सरोजिनी नायडू यांना देण्यात आली आहेत.
  • मुहम्मद अली जिना यांच्या चरित्राला सरोजिनी यांनी हिंदू-मुस्लिम सहकार्याच्या दूताचा दर्जाही दिला होता.
  • भारतातील लोकांनी सरोजिनी नायडू यांना भारताची नाइटिंगेल असे संबोधले. कारण त्यांच्या कविता वाचताना त्यांच्या सुंदर आवाजामुळे त्यांना हे नाव देण्यात आले.
  • त्यांच्या कवितांनी वेगळ्या प्रकारची भावना निर्माण केली, ज्याचा लोकांवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडला. आणि ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.

सरोजिनी नायडू यांनी लिहिलेले विचार

  • जेव्हा अत्याचार होतो तेव्हा फक्त स्वाभिमानाचा मुद्दा येतो आणि म्हणतो तो आज संपेल, कारण न्याय माझा हक्क आहे. जर तुम्ही बलवान असाल तर तुम्हाला कमकुवत मुलगा किंवा मुलगी यांना खेळ आणि काम या दोन्ही गोष्टींमध्ये मदत करावी लागेल.
  • एखाद्या राष्ट्राची महानता वंशातील मातांना प्रेरणा देणारे प्रेम आणि त्यागाच्या उदात्त आदर्शांमध्ये असते.
  • उग्र द्वेष जिथे उगवेल तिथे अशी आशा उगवेल, गोड प्रेम समृद्धी येईल की उच्च स्वप्ने आंब्याच्या झाडाच्या भांडणाला जागा देतील ‘द्विज प्राचीन पंथ,’ द्विज जाती आणि समाधी बांधणारी प्राचीन जात, जीवनाचे आनंदी उद्दिष्ट नाही निवारा. तुमचा यशस्वी चेहरा?
  • एखाद्याला द्रष्टा दृष्टी आणि देवदूताच्या आवाजाची गरज असते. मला आज असा कोणताही भारतीय पुरुष किंवा स्त्री माहित नाही की ज्यांच्याकडे त्या सर्व भेटवस्तू आहेत.
  • माझी तळमळ शमवण्यासाठी मी झोपेच्या भूमीत त्या जादूच्या लाकडात वाहणार्‍या शांतीच्या चैतन्याच्या धारांनी मला नमन करतो.
  • न्यायाची भावना इस्लामच्या आदर्शांपैकी एक आहे, कारण मी कुराण वाचत असताना मला असे वाटते की जीवनाची ती गतिशील तत्त्वे गूढ नसून संपूर्ण जगासाठी जीवनाच्या दैनंदिन आचरणासाठी व्यावहारिक नीतिशास्त्र आहेत.

सरोजिनी नायडू यांचा व्हिडिओ

FAQ

१. सरोजिनी नायडू यांचे पूर्ण नाव काय?

सरोजिनी नायडू यांचे पूर्ण नाव सरोजिनी अघोरीनाथ चटोपाध्याय असे होते , त्या एक महान कवियित्री व लेखिका होत्या. त्यांनी स्वातंत्रसंग्रामामध्ये सक्रीय सहभाग दर्शवला.

२. सरोजिनी नायडू भारतासाठी का प्रसिद्ध आहेत?

स्त्रियांना सक्षमीकरण करण्यासाठी व स्त्रियांना त्यांचा न्याय प्राप्त करून देण्यासाठी, सरोजिनी नायडू यांनी अतोनात कष्ट केले. सरोजिनी नायडू यांनी देशसेवा, समाजसेवा, इत्यादी.
अगदी मनोभावे केल्या. हैदराबादमध्ये ज्यावेळी प्लेगची साथ पसरत होती, त्या काळात त्यांनी फार परिश्रम घेऊन, जनसामान्य जनतेला सर्वतोपरी मदत केली. म्हणून सरोजिनी नायडू भारतासाठी प्रसिद्ध आहेत.

भारताच्या सरोजिनी नायडू नाइटिंगेल का आहेत?

नायडू यांच्या कवीच्या साहित्यिक कार्यामुळे
त्यांच्या कवितेतील रंग, कल्पकता आणि गीतात्मक गुणवत्तेमुळे त्यांना गांधींनी “नाइटिंगेल ऑफ इंडिया” हे टोपणनाव मिळवून दिले . 
त्यांच्या कामांमध्ये देशभक्ती आणि शोकांतिका यासह अधिक गंभीर विषयांवर मुलांच्या कविता आणि कवितांचा समावेश आहे.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास सरोजिनी नायडू यांच्याबद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे कमेंट करून आम्हाला कळवा; हा लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment