नेताजी सुभाष चंद्र बोस माहिती मराठी | Netaji Subhash Chandra Bose Information Marathi

Netaji Subhash Chandra Bose Information Marathi | नेताजी सुभाष चंद्र बोस माहिती मराठी – भारत देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याच्या हेतूने, अनेक राष्ट्र भक्तांनी देशाच्या सेवेसाठी विविध पद्धतीने लढा देऊन, देशाला स्वातंत्र्य देण्यास प्रयत्न केला. व ते हुतात्मे झाले. या स्वातंत्र्यलढयामध्ये विविध लढे लढून, देशभक्तांनी ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवला.काही अहिंसा व शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्यलढा लढत राहिले तर, काहींनी क्रांतीच्या माध्यमातून इंग्रजांना देशातून घालवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले.

स्वातंत्र्यलढ्यामधील विविध राष्ट्रभक्तांपैकी, प्रमुख व्यक्तिमत्व म्हणजे, नेताजी सुभाषचंद्र बोस. हे भारत देशातील एक प्रमुख थोर व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. यांचा जन्म २३ जानेवारी रोजी झाल्यामुळे, पूर्ण देशात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जन्मदिनाबद्दल २३ जानेवारी रोजी त्यांची जयंती साजरी केली जाते.

या लेखाच्या माध्यमाने आम्ही आपणास नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. त्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी, केलेल्या अतोनात प्रयत्नाची व योगदानाची माहिती आम्ही आपणास या लेखाच्या माध्यमातून देणार आहोत.

Table of Contents

नेताजी सुभाष चंद्र बोस माहिती मराठी | Netaji Subhash Chandra Bose Information Marathi

आपल्या भारत देशाचे महान नेते नेताजी सुभाष चंद्र बोस हे दिनांक २३ जानेवारी १८९७ रोजी आपल्या भारत भूमीवर जन्म घेऊन, भारतभूमीला धन्य केले. अशा महान नेत्याचे नाव सुभाषचंद्र जानकीनाथ बोस असे होते.

नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जीवन परिचय

मूळ नाव सुभाषचंद्र जानकीनाथ बोस
जन्मतारीख २३ जानेवारी १८९७
जन्मस्थळ कटक, ओरिसा
आईचे नाव प्रभावती
वडिलांचे नाव जानकीनाथ बोस
शिक्षणरेनशॉ कॉलेजिएट स्कूल, कटक (१२वी पर्यंत अभ्यास), प्रेसिडेन्सी कॉलेज, कलकत्ता (तत्त्वज्ञान), केंब्रिज विद्यापीठ, इंग्लंड
पत्नीचे नाव एमिली
मुलीचे नाव अनिता बोस
राजकीय विचारधाराराष्ट्रवाद, साम्यवाद, फॅसिझम प्रवृत्ती
मृत्यू १८ ऑगस्ट १९४५
मृत्यू स्थळ जपान

नेताजी सुभाष चंद्र बोस माहिती

भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महान क्रांतिकारक देशभक्तांपैकी नेताजी होते सुभाषचंद्र बोस. यांना शिक्षणाची फार आवड होती. त्यांनी आय.सी.एस. ही परीक्षा देऊन, परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.

महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्या काळात इंग्रजी सत्तेच्या विरोधात असहकार चळवळीला सुरुवात केली होती, त्यातील एका कार्यक्रमात सरकारी नोकरीचा त्याग करून, गांधीजींनी आरंभ केलेल्या असहकार चळवळीचा एक भाग म्हणून, त्यांना प्रतिसाद देण्यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी दिनांक २२ एप्रिल १९२१ रोजी आय.सी.एस. अधिकारी म्हणजेच सरकारी नोकरीचा राजीनामा दिला व स्वातंत्र्य लढ्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला.

सुभाषचंद्र बोस

सुभाष चंद्र बोस यांचे बालपण

ओरिसा प्रांतातील कटक या शहरात सुप्रसिद्ध बोस कुटुंबात 23 जानेवारी, 1897 रोजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म एका मोठ्या बंगाली कुटुंबात झाला होता. सुसंस्काराचे माहेरघर असणाऱ्या प्रभावतीदेवी आणि ख्यातनाम वकील जानकीनाथ बोस हे त्यांचे आई-वडील.जानकीनाथ बोस आणि श्रीमती प्रभावती देवी यांना १४ मुले होती. त्यात ६ मुली व ८ मुलगे होते. सुभाषचंद्र त्यांचे सहावे अपत्य व पाचवे पुत्र होते. आपल्या सर्व भावांपैकी सुभाषला शरदचंद्र अधिक प्रिय होते. शरदबाबू हे प्रभावती व जानकीनाथ ह्यांचे दुसरे पुत्र होते. सुभाष त्यांना मेजदा म्हणत असत. सुभाषचंद्र बोस यांच्या आई, उत्तर कलकत्त्याच्या सनातनी दत्त कुटुंबातील कन्या होत्या. ती एक मजबूत इच्छाशक्ती, हुशार आणि कुशल स्त्री होती जिने एक मोठे कुटुंब यशस्वीरित्या व्यवस्थापित केले. सुभाषचंद्र यांचे वडील जानकीनाथ चंद्र हे त्यावेळी एक प्रसिद्ध वकील होते 

सुभाषचंद्र बोस यांचे शिक्षण 

सुभाषचंद्र बोस हे लहानपणापासूनच धाडसी आणि तेजस्वी पुत्र होते. कटक येथील प्रोटेस्टंट युरोपियन शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. आणि हायस्कूलच्या शिक्षणासाठी १९०९ मध्ये रेवेनशॉ कॉलेजिएट स्कूलमध्ये प्रवेश केला. स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकांचा अभ्यास करण्याव्यतिरिक्त, त्यांचे मुख्याध्यापक वेणी माधवदास यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बराचसा प्रभाव सुभाषच्या बालमनावर पडला. वेणीमाधव दास आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत. त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्यामधली सुप्त देशभक्ती जागृत केली. शालेय शिक्षण घेत असतानाच त्याला अवांतर वाचनाची प्रचंड आवड निर्माण झाली होती. विशेषत: विवेकानंदांचे सर्वच्या सर्व ग्रंथे त्याने वाचून काढले. विवेकानंदाजवळ असणारा दीनदुबळ्यांचा कणव सुभाषने स्वत:च्या जीवनात उतरवला होता.

सुभाषचंद्र बोस

कटकजवळच्या एका खेड्यात पटकीची साथ आली तेव्हा दहावीच्या वर्गात शिकणारा सोळा वर्षांचा सुभाष त्या खेड्यातील गोरगरिबांच्या शुश्रूषेसाठी धावून गेला. सुभाषचे अवांतर वाचन, समाजसेवेची आवड पाहून घरच्या मंडळींना सुभाषच्या अभ्यासाची चिंता वाटायला लागली. वडिलांना तर तो दहावीची परीक्षा उत्तीर्ण करेल किंवा नाही याची काळजी लागली होती. सुभाषचंद्र बोस मॅट्रिकच्या परीक्षेत दुसरे आले. उच्चशिक्षणासाठी सुभाष यांनी कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तत्त्वज्ञान हा त्यांच्या विशेष आवडीचा विषय. सुभाष यांचे आकर्षक व्यक्तिमत्त्व, तीक्ष्ण बुद्धिमत्ता, अभ्यासपूर्ण विवेचनशैली, भारदस्त आवाज यामुळे कॉलेजमध्ये त्यांना अनेक मित्र लाभले आणि त्या सर्वांचे नेतृत्वही त्यांच्याकडेच आले.

वयाच्या सोळाव्या वर्षी 1913 साली सुभाषने हे प्रचंड यश संपादन केले. आणि त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे ते त्यांच्या अभ्यासात यशस्वी झाले. यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी १९११ मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, परंतु त्या वर्षाच्या शेवटी भारतविरोधी वक्तव्यावरून व्याख्याता आणि विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष झाला. ज्यावेळी सुभाषचंद्र बोस यांनी विद्यार्थ्यांची पाठराखण केली होती, त्यावेळी त्यांना एका वर्षासाठी महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले होते. आणि त्यांना परीक्षा देण्यापासून रोखण्यात आले.

१९१८ मध्ये, सुभाषचंद्र बोस यांनी कलकत्ता विद्यापीठाच्या स्कॉटिश कॉलेजमधून तत्त्वज्ञानात बी.ए. त्यानंतर, भारतीय नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी, सुभाषचंद्र बोस यांनी फिट्झविलियम कॉलेज, केंब्रिज (ICS) येथे प्रवेश घेतला. सुभाषचंद्र बोस यांनी चौथ्या क्रमांकावर परीक्षा उत्तीर्ण केली. आपल्या मुलाने उच्चशिक्षित होऊन ब्रिटिशांच्या शासनात अधिकारी व्हावे असे वडिलांना वाटत असे; पण सुभाष मात्र हायस्कूलमध्ये शिकत असतानाच ‘अनुशीलन समिती’सारख्या क्रांतिकारी संघटनेशी जोडला जात होता.

खुदीराम बोसला फाशी दिल्याची बातमी वाचून त्याला रडू कोसळलं होतं. रासबिहारी बोस यांच्या मदतनिधीला त्याने सढळ हाताने मदत केली होती. अचाट बुद्धिमत्ता, विलक्षण स्मरणशक्ती आणि उत्कृष्ट योजकता हे सुभाषचे विशेष गुण आणि अद्भुताची ओढ हा छंद! त्यांचे वडील जानकीनाथ यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नागरी सेवा विभागाने त्यांना नियुक्त केले. तथापि, सुभाषचंद्र बोस या नोकरीवर जास्त काळ राहू शकले नाहीत. कारण ते सुभाषचंद्र बोस होते. त्यांनी ही नोकरी नैतिकदृष्ट्या स्वीकारण्यास नकार दिला. कारण ती नोकरी करणे म्हणजे ब्रिटिश सरकारसाठी काम करण्यासारखे होते.

सुभाषचंद्र बोस यांचा काँग्रेसच्या कार्यात सहभाग

सुभाष चंद्र बोस यांनी त्यांची सरकारी नोकरीचा त्याग केला, व स्वातंत्र्यसंग्रामामध्ये कार्यरत झाले. त्यांच्यावर विविध क्रांतीकारक विचारांचा प्रचंड प्रभाव होता. काँग्रेस पक्षाच्या तरुण पिढीच्या नेत्यांमध्ये सुभाष चंद्र बोस यांना अतिशय अग्रगण्य स्थान प्राप्त झाले होते. काँग्रेस पक्षाने वसाहतीच्या स्वातंत्र्यापेक्षा, संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करावी. असा सुभाषचंद्रांनी पहिल्यापासूनच हट्ट धरला होता. काँग्रेस पक्षाने १९२९ रोजी लाहोर अधिवेशनामध्ये नेताजींनी मांडलेल्या संपूर्ण स्वातंत्र्याच्या ठरावास संमती दिली. या ठरावास काँग्रेस अधिकाऱ्यांची परवानगी मिळण्याचा मुख्य स्त्रोत म्हणजेच सुभाषचंद्र बोस होते.

सुभाषचंद्र बोस

सुभाषचंद्र बोस यांना चित्तरंजन दास बाबूंचे सहाय्य होते, ते त्यांचे कट्टर समर्थक व पाठीराखे म्हणून होते. आपल्या देशाचे हितचिंतक चित्तरंजन दास कोलकत्ता राज्याचे सर्वप्रथम महापौर म्हणून निवडून आले, ज्यावेळी ते महापौर म्हणून निवडून आले, त्यांनी कोलकत्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुभाष चंद्र बोस यांची नेमणूक केली. ज्यावेळी सुभाषचंद्र बोस कोलकत्ता राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते, त्यावेळी त्यांनी इतर क्रांतिकारकांशी संबंध ठेवल्याच्या आरोपावरून त्यांना इंग्रजांनी अटक केले. त्यांना मंडालेच्या तुरुंगामध्ये ठेवण्यात आले.

नेताजी सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी मतभेद

सुभाषचंद्र बोस व महात्मा गांधी यांच्यामध्ये विविध गोष्टींबद्दल मतभेद होत होते. गांधीजी हे अहिंसक व्यक्तिमत्व असून, त्यांना सुभाषचंद्र बोस यांच्या काही गोष्टी त्यांना पटत नव्हत्या, त्यामुळे त्यांच्यामध्ये मतभेद होत असत. इसवी सन १९३७ च्या झालेल्या, निवडणुकीच्या कालावधीनंतर काँग्रेस पक्षाने सत्तेमध्ये त्यांचा सहभाग दर्शवू नये, असे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे ठाम मत होते. परंतु, गांधीजींच्या तडजोडवादी धोरणांना नेताजींनी विविध प्रकारे सगळ्यांसमोर विरोध दर्शवला होता, व काँग्रेस मधील तरुण वर्ग यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पाठिंबा देत होते.

काँग्रेसच्या बैठकीत, नवीन आणि जुन्या विचारसरणीच्या लोकांमध्ये मतांचे विभाजन झाले, तरुण नेत्यांनी कोणतेही नियम पाळण्यास नकार दिला आणि स्वतःचे बनविण्यास प्राधान्य दिले, तर जुने नेते ब्रिटीश सरकारच्या नियमांचे पालन करीत. सुभाषचंद्र बोस आणि गांधीजींच्या दृष्टीकोनांना विरोध होता. ते महात्मा गांधींच्या अहिंसक विचारसरणीशी सहमत नव्हते; त्याची विचारसरणी हिंसेवर विश्वास ठेवणाऱ्या तरुणाची होती. दोघांची विचारधारा भिन्न होती, पण ध्येय एकच होते: भारताला गुलामगिरीतून मुक्त करणे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली त्यावेळी महात्मा गांधीना ही निवड योग्य वाटली नाही. त्यांनी बोस यांच्या अध्यक्षपदाचा विरोधही केला होता. या निवडीला गांधीचा विरोध होता तरी केवळ पूर्ण स्वराज्य मिळवण्याच्या उद्देशाने विरोध होता. स्वत:चे मंत्रिमंडळ बनवण्याव्यतिरिक्त, बोस यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण केले. १९३९ च्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत, बोस यांनी पट्टाभी सिताराय्या (गांधींचे पसंतीचे उमेदवार) यांचा पराभव केला, परंतु त्यांचे अध्यक्षपद अल्पकाळ टिकले कारण त्यांचे विचार काँग्रेस कार्यकारिणीशी सुसंगत नव्हते.

नेताजी यांना काँग्रेसचे अध्यक्ष पद

हरीपुरा ठिकाणी इसवी सन १९३८ रोजी काँग्रेस पक्षाचे लागोपाठ दुसऱ्या वर्षीचे अध्यक्ष म्हणून, सुभाषचंद्र बोस यांची नेमणूक झाली. त्या कालावधीपासून सुभाषचंद्र व काँग्रेसच्या इतर नेत्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टींवरून मतभेद वाढतच गेले.

यानंतर इसवी सन १९३९ च्या सुमारास त्रिपुरी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची नेमणूक नेताजींनी स्वतः लढवली. त्यांच्या विरोधात महात्मा गांधींच्या सहाय्याने पट्टाभिसीतारामय्या हे विरोधक म्हणून उभे राहिले, नेताजी सुभाषचंद्र बोस महात्मा गांधींच्या विरुद्ध उभे असून देखील, सुभाषचंद्र बोस यांना भरघोस मते मिळून ते सलग दुसऱ्या वर्षी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.

नेताजी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना

संपूर्ण स्वातंत्र्याची निर्वाणीची मागणी ब्रिटिश शासनाकडे करावी, त्यासाठी त्यांना ठराविक कालमर्यादा द्यावी. संपूर्ण स्वातंत्र्य दिले नाही तर त्यासाठी देशव्यापी सत्याग्रह आणि लढा उभारावा, जगातील राजकीय परिस्थितीचा फायदा घ्यावा असे मुद्दे सुभाषबाबूंनी मांडले होते. सुभाषबाबूंनी सुचविलेला हा निकराचा लढा काँग्रेसने पुढे 1942 मध्ये उभारला; पण 1939 च्या या अधिवेशनात मात्र सुभाषबाबूंना जहाल ठरविण्यात आले. ज्या दुर्दैवी पद्धतीने त्यांना एकाकी पाडण्यात आले, त्यामुळे पुढचा इतिहास बदलला. सुभाषबाबूंनी नाइलाजास्तव ‘फॉरवर्ड ब्लॉक’ची स्थापना केली आणि ब्रिटिशांविरुद्ध लढा तीव्र केला.

सुभाषचंद्र बोस

मुंबई, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रांत अशा सर्व प्रांतांत फॉरवर्ड ब्लॉकच्या सभा झाल्या. सुभाषबाबूंसोबत काँग्रेसमधील पुरोगामी नेते आणि सेनापती बापट, श्री. कामत, कॉ. रुईकर, सरदार शार्दुलसिंग व इतर कार्यकर्ते कार्यरत होते. फॉरवर्ड ब्लॉकच्या रामगड येथील अधिवेशनात राष्ट्रव्यापी आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यासोबत काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी संबंध तोडले, व सहकार्य करणे बंद केले. त्यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन, स्वतःचा एक वेगळा फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन केला.

सुभाषचंद्र बोस यांचे नजर कैदेत ठेवले गेले

भारत देशामध्ये ज्यावेळी दुसरे महायुद्ध चालू झाले, त्यानंतर काँग्रेस पक्षाने ब्रिटिश सरकार विरुद्ध भयानक आंदोलन सुरू करावे अशी मागणी, नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी केली. त्यांनी घेतलेला या निर्णयामुळे इंग्रज सरकारने अंतर्गत सुरक्षा कायदा खाली नेताजींना अटक केले.

यानंतर काही कालावधीने नेताजींची सुटका झाली, परंतु इंग्रज सरकारने नेताजींना त्यांच्या स्वतःच्या राहत्या घरात नजर कैदेमध्ये ठेवले.

सुभाषचंद्र बोस यांचे जर्मनीला प्रयाण

१९४१ साली नेताजी सुभाष चंद्र बोस नजर कैदेतून अत्यंत हुशार व चालाकिने स्वतःची सुटका करून इंग्रज सरकारला खबर न देता अफगाणिस्तानच्या मार्गे जर्मनीस जाऊन पोहोचले. त्या ठिकाणी जाऊन त्याने बर्लिन वरून भारतीय जनतेला विविध उपदेश देण्यासाठी भाषणे केली. ब्रिटिश सरकार विरुद्ध सशस्त्र संघर्ष करावयाचे प्रकट आवाहन सुद्धा भारतीय जनतेला दिले. त्यानंतर काही कालावधीने नेताजींनी जर्मनीमध्ये “इंडियन इंडिपेंडेंस लीग” या नावाची एक स्वतंत्र संघटना सुद्धा स्थापन केली.

सुभाषचंद्र बोस जर्मनीवरून जपानला गेले

सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनीमध्ये राहून भारतीय जनतेला भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी भाषणांच्याद्वारे उद्देश केले. परंतु त्यांना जर्मनीमध्ये राहून तितकेसे कार्य पूर्ण करता येणार नाही असे समजतात, त्यांनी जपानमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

नेताजी सुभाषचंद्र बोस हे जपान मध्ये स्थलांतरित झाले, त्यावेळी रासबिहारी बोस यांनी जपानमध्ये सापडलेल्या भारतीय युद्ध कायद्यांचा सहाय्याने, “आझाद हिंद सेनेची” स्थापना केली. या आझाद हिंद सेनेचे दुसरे अधिवेशन इसवी सन १९४२ मध्ये बँक मध्ये भरवण्यात आले. या अधिवेशनाच्या आयोजनाच्या निमित्ताने नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आमंत्रण देण्यात आले होते.

नेताजी आझाद हिंद सेनेचे सरसेनापती

इसवी सन १९४२ मध्ये झालेल्या आझाद हिंद सेनेच्या दुसऱ्या अधिवेशनाला नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी उपस्थिती दर्शवली. रासबिहारी बोस यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करण्याची विनंती केली. ह्या विनंतीस मान देत, नेताजी यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करण्याचे स्वीकारून, ते सरसेनापती बनले.

नेताजींच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेमध्ये एक नवचैतन्य व प्रेरणा वाढली. नेताजींनी आझाद हिंद सेनेची विविध पथके उभारून त्यांना नेहरू पथक, गांधी पथक, अशा प्रकारची नावे प्रदान केली. त्याचबरोबर नेताजींनी “झाशीची राणी” या नावाने स्त्रियांचे एक पथक उभारून, त्याचे नेतृत्व करण्यासाठी कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन यांची नेमणूक केली. आझाद हिंद सेनेचे तिरंगा ध्वज निशाण होते. “जय हिंद” हे अभिवादनाचे शब्द होते. ज्यामध्ये “चलो दिल्ली” हे घोषवाक्य असून, “कदम बढाये जा” हे आझाद हिंद सेनेचे समर गीत होते.

आझाद हिंद सेनेच्या, माध्यमाने सुभाषचंद्र बोस यांनी “तुम मुझे खून दो | मै तुम्हे आजादी दूंगा” | अशा प्रकारची घोषणा करत, भारतीयांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. सुभाषचंद्र बोस नंतर जुलै १९४३ मध्ये जर्मनीहून सिंगापूर येथे स्थलांतरित झाले आणि भारतीय राष्ट्रीय सैन्याच्या निर्मितीची आशा पुन्हा जागृत केली. बिहारी बोस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. रासबिहारी बोस यांनी नंतर सुभाषचंद्र बोस यांना संघटनेचे पूर्ण नियंत्रण दिले. INA चे नाव बदलून आझाद हिंद फौज ठेवण्यात आले आणि त्याच वेळी सुभाषचंद्र बोस यांना नेताजी म्हणून संबोधण्यात आले.

नेताजींनी केवळ सैन्याची पुनर्रचनाच केली नाही तर आग्नेय आशियाई डायस्पोरांचेही लक्ष वेधून घेतले. लोक त्याच वेळी सैन्यात भरती होण्याव्यतिरिक्त आर्थिक मदत देऊ लागले. त्यानंतर, आझाद हिंद फौजेने एक स्वतंत्र महिला युनिट स्थापन केले, जे आशियातील पहिले आहे. आझाद हिंद फौज झपाट्याने वाढली आणि ती आझाद हिंद तात्पुरत्या सरकारच्या अंतर्गत कार्य करू लागली. नऊ अक्ष राज्यांनी त्यांना मंजूरी दिली आणि त्यांच्याकडे स्वतःचे मुद्रांक, चलन, न्यायालये आणि नागरी संहिता होते.

हिंदुस्तानचे हंगामी सरकार

१९४३ मध्ये हिंदुस्तानचे हंगामी सरकार सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केले. या सरकारला जर्मनी, इटली, जपान, इत्यादी. विविध राष्ट्रांकडून सुद्धा परवानगी प्राप्त झाली. सुभाषचंद्र बोस यांनी नेतृत्व केलेल्या आझाद हिंद सेनेला युद्ध सज्ज बनवले. व भारत देशाला, इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी “चलो दिल्ली” असा आदेश त्यांच्या आझाद हिंद सेनेला दिला.

प्रत्येक सैनिकांमध्ये देशाबद्दल आदर व गुलामगिरीतून सुटण्याची भावना निर्माण करण्यासाठी, “तुम मुझे खून दो | मै तुम्हे आजादी दूंगा” | अशा प्रकारची घोषणा करत त्यांना प्रेरित केले.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची इंफाळपर्यंत धडक

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली प्रेरित झालेल्या विविध क्रांतीकारकांनी, देशाला स्वातंत्र्य मिळवण्याच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली. यामध्ये कॅप्टन लक्ष्मी, स्वामीनाथन कर्नल, जिल्हा मेजर जगन्नाथ राव, शहनवाज खान, इत्यादींनी. नेताजींच्या नेतृत्वाखाली विजय प्राप्त करून, हिंदुस्तानच्या सीमेपर्यंत येऊन पोहोचले. हिंदुस्तान मधील कोहिमा, भाग जिंकून, नंतर आझाद हिंद सेना इंफाळपर्यंत पर्यंत येऊन पोहोचली. परंतु काही कारणास्तव आझाद हिंद सेनेला इंफाळवर वर्चस्व प्राप्त करता आले नाही.

आपल्या भाषणाने नेताजींनी जनसमुदायाला प्रेरणा दिली

  • “जय हिंद” ,”चलो दिल्ली” , “कदम बढाये जा” ,‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा’ यासारख्या घोषणा, अभिवादनचे शब्द आणि समरगीत दिले.
  • देशाला ब्रिटिश राजवटीपासून मुक्त करण्यासाठी आझाद हिंद फौजेचे प्रमुख सेनापती नेताजी यांच्या नेतृत्वाखाली सैन्याने भारताकडे कूच केले.
  • सैन्याने बर्माच्या आघाडीवर ब्रिटीशांशी स्पर्धात्मक लढाई आपल्या पहिल्या वचनबद्धतेसह लढली, अखेरीस इंफाळ, मणिपूरच्या मैदानावर भारतीय राष्ट्रध्वज फडकवला.
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १९४४ च्या भाषणाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आणि त्या वेळी त्यांचे भाषण हे त्यावेळी हेडलाइन्स बनल्या.
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भाषणामुळे मोठ्या संख्येने लोक ब्रिटिश शासकांविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले.
  • कॉमनवेल्थ सैन्याने अचानक केलेल्या हल्ल्यामुळे जपानी आणि जर्मन सैन्याने सावधगिरी बाळगली. हिंद फौजेची प्रभावी राजकीय एकक बनण्याचे सुभाषचंद्र बोस यांचे स्वप्न रंगून बेस कॅम्पला माघार घेण्यास भाग पाडल्याने भंग पावले.
  • वाटेतच अंदमान आणि निकोबार बेटे मुक्त झाली आणि परिणामी दोन बेटांना स्वराज आणि शहीद ही नावे देण्यात आली. अशा प्रकारे रंगूनला लष्कराचा नवीन बेस कॅम्प म्हणून स्थापित करण्यात आले.
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू ही भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे.
  • आझाद हिंद फौजेच्या पराभवानंतर मदत मागण्यासाठी नेताजींनी रशियाला जाण्याची योजना आखली. सुभाषचंद्र बोस यांचा मात्र १८ ऑगस्ट १९४५ रोजी तैवानमध्ये विमान अपघातात मृत्यू झाला होता.
  • यावेळी, नेताजींचा मृतदेह सापडला नाही, आणि अपघाताचा कोणताही पुरावा सापडला नाही, त्यामुळे सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू हा वादाचा स्रोत राहिला आणि भारतीय इतिहासातील सर्वात मोठे रहस्य आहे.

सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात अंत

देशाला स्वातंत्र्य मिळवण्याची ओढ, जिज्ञासा, नेताजींच्या मनामध्ये खदखदत होती. यासाठी त्यांनी जर्मनी, जपान, इत्यादी. देश फिरून आझाद हिंद सेना, इंडियन इंडिपेंडेंस लीग, यांसारख्या संघटनेची स्थापना केली, यांच्या माध्यमाने देशाला स्वातंत्र्य मिळवण्याचा होताना प्रयत्न केला.

दिनांक १८ ऑगस्ट १९४५ च्या दिवशी जपान सरकारने केलेल्या विनंतीनुसार सुभाषचंद्र बोस हे विमानाने टोकियाला जात असताना, सुभाषचंद्र बोस यांच्या विमानाचा फोर्मोसा या बेटावर अपघात झाला, व यामध्येच सुभाषचंद्र बोस यांचा आकस्मित मृत्यू झाला. वृत्तानुसार, मित्सुबिशी की-२१ बॉम्बर ज्यावर ते उड्डाण करत होते ते तैवानमध्ये इंजिनच्या समस्येमुळे क्रॅश झाले.

त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तरी नेताजी सुभाषचंद्र बोस या अपघातातून वाचले नाहीत आणि आयुष्यभर झोपी गेले. त्यानंतर तायहोकू येथील निशी होंगंजी मंदिरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि बौद्ध स्मारक सेवा आयोजित करण्यात आली. त्यांच्या अवशेषांवर नंतर टोकियोच्या रेन्कोजी मंदिरात अंत्यसंस्कार करण्यात आले.

महात्मा ज्योतिबा फुले माहिती मराठी 

‘नेताजी’ ही पदवी कोणी दिली?

जर्मन हुकूमशहा अडॉल्फ हिटलरने सुभाषचंद्र बोस यांना पहिल्यांदा ‘नेताजी’ म्हणून संबोधले होते, हे फार कमी लोकांना माहिती आहे. सुभाषचंद्र बोस यांना रवींद्रनाथ टागोर यांच्याकडून देश नायक ही पदवी मिळाली असे म्हणतात.

नेताजींबद्दल काही रोचक तत्थ्य

महात्मा गांधींना सुभाषचंद्र बोस यांनी ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले होते.

सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबद्दल बोलायचे झाले तर ते आजपर्यंत गूढच राहिले आहे.१९४५ मध्ये जपानला जात असताना सुभाषचंद्र बोस यांचे विमान तैवानमध्ये क्रॅश झाले होते. तरीही त्याचा मृतदेह सापडला नाही. असे देखील सांगितले जाते.

सुभाषचंद्र बोस यांना १९२१ ते १९४१ या काळात देशातील वेगवेगळ्या तुरुंगात ११ वेळा तुरुंगवास भोगावा लागला.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषचंद्र बोस यांची दोनदा निवड झाली होती.

नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे असामान्य कार्य

रासबिहारी बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेच्या मदतीने, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिश सरकारचा पराभव करून, आपली भारत भूमी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याचे, नेताजींचे स्वप्न नेताजींच्या जीवनकालात पूर्ण झाले नाही. परंतु त्यांनी केलेल्या या अतोनात कार्यामुळे, असंख्य भारतीयांच्या मनामध्ये देशभक्ती जागरूक झाली.  

देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी. व देशाला इंग्रजांच्या गुलामगिरी मधून मुक्त करण्यासाठी. प्रत्येक भारतीयाच्या मनात देश सेवेची नवीन प्रेरणा निर्माण झाली. नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी केलेल्या बलिदानातून भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचा असीम त्याग आपल्याला दिसून येतो/ आज सुद्धा इतिहासाच्या पानावर क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव सुवर्णाक्षरांनी नोंदवले गेले आहे.

सुभाषचंद्र बोस यांच्याकडे कुशल संघटक आणि धडाडीचा नेता असण्यासोबतच लेखनीद्वारे स्वतःला व्यक्त करण्याची क्षमता होती. या संदर्भात, त्यांची काही पुस्तके त्याकाळी लोकांच्या मनात चांगलीच गाजली होती आणि त्यातील काही पुस्तकांचे तपशील आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

  • आझाद हिंदमध्ये लिहिणे आणि बोलणे
  • भारतीयांचे यात्रेकरू
  • मातृभूमीची हाक
  • काँग्रेसचे अध्यक्ष
  • भारतीय स्वातंत्र्ययुद्ध (१९२०-४२) भारत आणि युनायटेड स्टेट्स यांच्यात लढले गेले.
  • एक वळण सह नेतृत्व
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे उल्लेखनीय लेखन

लेखकांची नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यावरील चरित्रे

अनेक नामवंत लेखकांनी मराठीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे चरित्र लिहिले आहे. त्यांतली काही प्रसिद्ध चरित्रे

  • महानायक – विश्वास पाटील
  • नेताजी – वी. स. वाळिंबे
  • नेताजी सुभाषचंद्र बोस – रमेश मुधोळकर
  • जयहिंद आझाद हिंद – वि. स. वाळिंबे
  • नेताजींचे सीमोल्लंघन – एस. एम. जोशी
  • गरुडझेप – वि. स. वाळिंबे
  • नेताजी सुभाष मूळ इंग्रजी Subhash – a Polytical Biography, लेखक : सीतांशू दास; मराठी अनुवाद : श्रीराम ग. पचिंद्रे
  • No Secrets – अनुज धर

सुभाष चंद्र बोस यांना भारतरत्न पुरस्कार

सुभाष चंद्र बोस यांचा झालेल्या विमान अपघात यानंतर, त्यांनी केलेल्या अतोनात कार्याचा व संघर्षाचा पुरस्कार म्हणून त्यांच्या मरणोत्तर १९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारत सरकारकडून “भारतरत्न” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. परंतु नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचा कोणताही ठोस पुरावा सध्या उपलब्ध नाही, त्यामुळे त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन, सन्मानित करणे चुकीचे होईल, असा युक्तिवाद लढवत सुप्रीम कोर्टच्या आदेशाद्वारे पुरस्कार काढून घेण्यात आला.

पश्चिम बंगाल विधानसभेसमोर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारण्यात आला असून, भारतीय संसदेच्या भिंतींवरही त्यांचे चित्र दिसू शकते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नुकतेच लोकप्रिय संस्कृतीत चित्रण करण्यात आले. या भारतीय राष्ट्रवादी नायकावर अनेक चित्रपट बनवले गेले आहेत.

सुभाषचंद्र बोस यांच्यावरील चित्रपट (Subhash Chandra Bose movie in Marathi)

नेताजींच्या जीवनावर आधारित हिंदी आणि बंगालीसह अन्य भाषांमधील चित्रपट तयार करण्यात आला आहे.

  • द फॉरगॉटन हिरो– नेताजी सुभाषचंद्र बोस
  • द फॉरगॉटन
  • सुभाष बोलची, आमी सुभाष बोलची वगैरे
  • रमेश सैगल दिग्दर्शित ‘समाधी’ 
  • पियुष बोस दिग्दर्शित ‘सुभाष चंद्र
  • नेताजी सुभाष चंद्र बोस: द फॉरगॉटन हिरो
  • द फॉरगॉटन आर्मी
  • बोस-डेड/अलाइव्ह

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या बद्दल काही मनोरंजक माहिती

इसवी सन १९४२ मध्ये सुभाषचंद्र बोस हिटलरकडे जाऊन, त्यांनी भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी त्यांच्यासमोर प्रस्ताव मांडला. परंतु, हिटलरने हा प्रस्ताव नाकारत, त्या बदल्यात त्यांनी नेताजी ना कोणतेही स्पष्ट मत दिले नाही.

सुभाष चंद्र बोस यांना स्वातंत्र्यवीर भगतसिंग यांना ब्रिटिश सरकारच्या कायद्यातून वाचवायचे होते, यासाठी त्यांनी महात्मा गांधींना इंग्रजांना दिलेले वचन मोडण्यास सांगितले, परंतु महात्मा गांधीजींनी ते वचन मोडले नाही, व ते त्यांच्या या उद्देशांमध्ये सफल झाले नाहीत.

नेताजी सुभाषचंद्र बोस  भारतीय नागरिक परीक्षेत चौथा क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाले होते. परंतु, मनामध्ये असणाऱ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी व इंग्रजांना देशांमधून घालविण्यासाठी, त्यांनी सरकारी आरामदायी नोकरी न स्वीकारता, देशप्रेम व देशभक्ती स्वीकारण्याचा मोठा निर्णय घेतला.

जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये झालेल्या हृदयस्पर्शी घटनेमुळे, नेताजी सुभाष चंद्र बोस अत्यंत क्रोधित झाले. व इंग्रजांविरुद्ध त्यांच्या मनात राग भरून देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी, प्रत्येक स्वातंत्र्यलढाणामध्ये हुरहुरीने सहभागी झाले.

सुभाष चंद्र बोस यांना १९२१ ते १९४१ या कालावधी दरम्यान, देशातील विविध तुरुंगांमध्ये साधारणतः ११ वेळा तुरुंगवास भोगावा लागला.

नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी सलग दोन वेळा अध्यक्ष म्हणून निवडून आले.

सुभाषचंद्र बोस यांचे विचार (Thoughts of Subhash Chandra Bose in Marathi)

  • जर तुम्ही मला रक्त दिले तर मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन.
  • ज्यांचा स्वतःच्या शक्तीवर विश्वास आहे ते पुढे जातात, तर जे उधार घेतलेल्या शक्तीवर अवलंबून असतात त्यांना दुखापत होते.
  • त्यांच्याकडे एक प्रतिभा होती ज्याने लोकांना त्यांच्याकडे आकर्षित केले आणि त्यावेळच्या तरुणांमध्ये नवीन उत्साह आणि शक्ती निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. इतिहासाच्या पानांवर सुभाषचंद्र बोस यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरलेले आहे.
  • माझ्या वैयक्तिक अनुभवाने मला शिकवले आहे की आशेचा एक किरण नेहमीच आपल्याला जीवनात स्थिर ठेवतो.
  • आपल्या स्वातंत्र्याची रक्तात किंमत मोजण्याची जबाबदारी आपली आहे. आपल्या बलिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी आपण पुरेसे मजबूत असले पाहिजे.
  • देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा अनेक भारतीय स्वातंत्र्यसैनिकांपैकी नेताजी सुभाषचंद्र बोस हे एक होते.
  • आपला प्रवास कितीही कठीण, क्लेशदायक किंवा कठीण असला तरी आपण पुढे जात राहिले पाहिजे. यश कदाचित खूप दूर असेल, परंतु ते शेवटी येईल.
  • लक्षात ठेवा, सर्वात वाईट गुन्हा म्हणजे अन्याय सहन करणे आणि वाईट करार करणे.

नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे राष्ट्रगीत

नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे व्यक्तिमत्व निर्भय, धडाडी व कणखर होते. त्यांच्याकडे दूरदृष्टी व पूरक आत्मविश्वास होता. या सर्व गोष्टींमुळे कोणत्याही प्रसंगाच्या काळात नेताजी सुभाषचंद्र बोस हे घाबरले नाहीत, डगमगले नाहीत. म्हणून आजही लोकांच्या मनात त्यांचे स्थान व आदर तितकाच आहे/ लोक आजही सुभाष चंद्र बोस यांना नेताजी म्हणून संबोधतात/ आझाद हिंद सेनेच्या स्थापनेनंतर आझाद हिंद सेनेने स्वीकारलेले राष्ट्रगीत, हे स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत बनले. या राष्ट्रगीताची रवींद्रनाथ टागोर यांनी पुनर्रचना करून भारताचे राष्ट्रगीत जनगणमन बनवले. त्याचे थोडक्यात बोल खालील प्रमाणे –

शुभ सुख चैन की बरखा बरसे
भारत भाग्य है जागा
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा,
द्राविड, उत्कल, बंगा.
चंचल सागर, विंध्य, हिमाचल,
नीला, यमुना, गंगा.
तेरे नीत गुण गाए
तुझसे जीवन पाये
सब तन पाय आशा
सुरज बनकर जगपर चमके
भारत नाम सुभागा
जय हो, जय हो, जय हो, जय जय जय हो.
भारत नाम सुभागा

सुभाषचंद्र बोस जयंती  (Jayanti of Subhash Chandra Bose in Marathi)

सुभाषचंद्र बोस हे भारताचे महान स्वातंत्र्य सेनानी आणि आझाद हिंद सैन्याचे सरसेनापती म्हणून ओळखले जातात. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या निर्भिड आणि प्रेरणादायी योगदानाच्या स्मरणार्थ २३ जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस देशभर ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

नेताजींच्या कार्याचा आणि स्वातंत्र्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा गौरव करणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम या विशेष प्रसंगी आयोजित करण्यात येतात. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना या दिवशी देशभरातील मान्यवर आणि नागरिकांकडून सन्मानित करण्यात येते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारीला झाला होता, म्हणून हा दिवस दरवर्षी सुभाषचंद्र बोस जयंती म्हणून साजरा केला जातो. यावर्षी 2023 मध्ये, 23 जानेवारी हा त्यांचा 125 वा वाढदिवस म्हणून साजरा केला जाईल.

प्रश्न

१) सुभाष चंद्र बोस यांनी कोणती प्रसिद्ध घोषणा दिली होती ?

सुभाष चंद्र बोस यांना रासबिहार बोस यांनी आझाद हिंद सेनेचे सरसेनापती म्हणून नियुक्त केले. सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेने विविध कार्य केली. भारतीय नागरिकांना देशभक्तीसाठी प्रभावित करण्यासाठी सुभाष चंद्र बोस यांनी “तुम मुझे खून दो | मै तुम्हे आजादी दूंगा”| अशा प्रकारचा नारा लावत, देशा बद्दल जनतेमध्ये प्रेरणा निर्माण केली.

२) सुभाष चंद्र बोस यांचा जन्म कधी झाला ?

महान व थोर क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ कटक, ओरिसा या ठिकाणी झाला.

३) सुभाष चंद्र बोस यांनी स्थापन केलेला वेगळा पक्ष कोणता ?

नेताजी सुभाषचंद्र बोस हे काँग्रेसचे अध्यक्ष होते, त्यावेळी काँग्रेसच्या इतर कार्यकर्त्यांनी नेताजींची असहकार पुकारला. व यादरम्यान नेताजींनी, काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन, स्वतःचा वेगळा “फॉरवर्ड ब्लॉक” हा पक्ष स्थापन केला.

४) नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आईचे नाव काय होते ?

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या मातोश्रीचे नाव “प्रभावती देवी”  होते.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कुठे भारताच्या हंगामी सरकारची घोषणा केली?

नेताजींनी २१ ऑक्टोबर १९४३ रोजी सिंगापूर याठिकाणी ‘स्वतंत्र हिंदूस्थानचे हंगामी सरकार’ स्थापन केलयाची घोषणा केली

सुभाष चंद्र बोस यांची २०२३ मध्ये कितवी जयंती आहे?

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक, ओरिसा येथे झाला. सुभाषचंद्र बोस यांची २०२३ मध्ये १२५ वी जयंती आहे.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास नेताजी सुभाष चंद्र बोस बद्दल माहिती दिली आहे.

नेताजी सुभाष चंद्र बोस माहिती मराठी हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा,व लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत सुद्धा नक्की शेयर करा धन्यवाद.

Leave a comment